चाहत्यांच्या गर्दीबद्दल वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी मानले आभार

कोलकाताच्या इडन गार्डनवर टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना पार पडला. भारताचा खेळ पाहता भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल असे वाटल्याने अनेक चाहत्यांनी आधीच तिकीटे काढून ठेवली होती. 

Updated: Apr 5, 2016, 10:45 AM IST
चाहत्यांच्या गर्दीबद्दल वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी मानले आभार title=
सौजन्य - ट्विटर

कोलकाता : कोलकाताच्या इडन गार्डनवर टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना पार पडला. भारताचा खेळ पाहता भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल असे वाटल्याने अनेक चाहत्यांनी आधीच तिकीटे काढून ठेवली होती. मात्र सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. 

भारत अंतिम फेरीत नसल्याने इडन गार्डनवर क्रिकेट चाहते कमी असतील अशी अपेक्षा होती. मात्र वेस्ट इंडिज वि इंग्लंडच्या सामन्याला क्रिकेट रसिकांनी मोठ्या उत्सुकतेने हजेरी दर्शवली. अनेक चाहत्यांचा तर वेस्ट इंडिज संघाला पाठिंबा होता. 

वेस्ट इंडिजचा विजय झाल्यानंतर चाहत्यांनीही विंडीज संघासोबत सेलिब्रेशन सुरु केले. इडन गार्डनवर मोठ्या संख्येने आलेल्या क्रिकेट चाहत्यांचे यावेळी वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंनी आभार मानले. ब्राव्होने तर प्रेक्षकांच्या दिशेने उभा राहत सलामही ठोकला