लग्नात हुंड्याच्या वादावरुन मुलीच्या मामाला मारहाण

ऐन लग्नात हुंड्याच्या वादावरुन मुलीच्या मामाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडलाय. ऐरोलीत राहणाऱ्या एका मुलीचं लग्न वडाळा इथं राहणाऱ्या शैलेश गुप्ता याच्याशी ठरलं होतं. विवाह ठरवताना दोन लाख रोख हुंडा देण्याचे ठरलं त्याप्रमाणे हुंडा देण्यातही आला.

Updated: Jan 31, 2016, 09:04 AM IST
लग्नात हुंड्याच्या वादावरुन मुलीच्या मामाला मारहाण title=

नवी मुंबई : ऐन लग्नात हुंड्याच्या वादावरुन मुलीच्या मामाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडलाय. ऐरोलीत राहणाऱ्या एका मुलीचं लग्न वडाळा इथं राहणाऱ्या शैलेश गुप्ता याच्याशी ठरलं होतं. विवाह ठरवताना दोन लाख रोख हुंडा देण्याचे ठरलं त्याप्रमाणे हुंडा देण्यातही आला.

विवाहाचे सुरुवातीचे विधी पार पडले. त्यानंतर अचानक नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांनी एक लाख रुपयांची मागणी केली. ऐन वेळी ही मागणी पूर्ण करणं हे वधूच्या नातेवाईकांना शक्य नव्हतं. यावरुन त्यांच्या बाचावाची झाली आणि मुलाकडच्या काही नातेवाईकांनी मुलीच्या मामाला बेदम मारहाण केली. 

सध्या एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी नवरदेव शैलेश गुप्ता, नवरदेवाचे वडील दयानंद गुप्ता आणि इतर तिघांना अटक केलीय. इतर दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या सातही जणांवर हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.