पालघर @ महाराष्ट्राचा 36वा जिल्हा

Updated: Aug 1, 2014, 03:24 PM IST
पालघर @ महाराष्ट्राचा 36वा जिल्हा  title=

 

पालघर : महाराष्ट्राचा 36वा जिल्हा म्हणजेच पालघर जिल्हा आजपासून अस्त्तित्वात आला आहे.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नव्या जिल्हयाच्या मुख्यालयाचे उद्घाटन पार पडलयं. 

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर या नव्या आदिवासी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. सध्या या जिल्ह्यात पालघर,वसई, मोखाडा,जव्हार, वाडा,  तलासरी,विक्रमगड आणि डहाणु या आठ तालुक्याचा समावेश आहे.

जवळपास ३०  लाख लोकसंख्या नव्या जिल्ह्याची असणार आहे. मागील अनेक वर्षापासुन ठाणे  जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची मागणी  प्रलंबित होती. नेहमीच  विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा निर्मितीचा विषय निघात असे, मात्र प्रत्यक्षात मुहुर्त मिळत नव्हता. शेवटी आघाडी सरकारनं एकमतानं निर्णय घेवुन पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मीती केली आणि  इथल्या जनतेची अनेक वर्षाची मागणी पुर्ण  केलीय.

दरम्यान नवीन जिल्ह्या मुख्यालयासाठी कोणतं ठिकाण असावं यावरुन  बरेच वाद  झाले, अखेर तो मान पालघरला मिळालाय. नव्या मुख्यालयाच्या एकाच इमारतीत  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधिक्षक प्रशासकिय कार्यभार  सांभाळणार आहेत. 

दरम्यान नव्या पालघर जिल्ह्यात वसई-विरार महानगर पालिका,  तर जव्हार ,डहाणु आणि पालघर या तीन नगरपरीषदा येतात तसचं जिल्हा परीषदेचे  ३७ सदस्य या भागात येतात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.