जमशेदजी नौसेरवानजी टाटा यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस गुजरातच्या नवसारी नावाच्या एका छोट्याशा खेड्यात एक लहानसं रोपटं लावलं. आता या रोपट्याचा वटवृक्ष झालाय, त्याचं नाव टाटा उद्योग समूह. इतक्या वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द असलेला हा देशातला एकमेव उद्योग समूह असावा. या वाटचालीत अनेक दिग्गजांनी टाटा समूहाचं हे शिवधनुष्य लीलया पेललं. टाटा सन्स’चे अध्यक्ष रतन टाटा निवृत्त झाल्याने सायरस मिस्त्री हे पदभार स्वाकारत आहेत. मिस्त्री २००६ पासून टाटा सन्सच्या डायरेक्टरपदी कार्यरत आहेत. नोव्हेंर २०११ मध्ये त्यांची नियुक्ती उपाध्यक्ष (डेप्युटी चेअरमन) म्हणून करण्यात आली होती. |