भारतीय सिनेजगतातील मौलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे ‘शोले’. रमेश सिप्पी यांचं महाकाव्य ठरलेल्या शोले सिनेमात मनोरंजनाचा पूर्ण मसाला होता. यात पुन्हा अमिताभ जया एकत्र होते. पण लोकांना आवडली ती अमिताभची धर्मेंद्रसोबतची ‘जय-वीरू’ची जोडी. ‘ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूट’च्या मतदानातही ‘टॉप १० भारतीय सिनेमां’मध्ये शोलेचा नंबर वरचा लागतो. |