बांगलादेशचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात, हे आहे कारण

भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सध्या टी-20 ट्रायसीरिज सुरु आहे.

Updated: Mar 14, 2018, 09:23 PM IST
बांगलादेशचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात, हे आहे कारण title=

कोलंबो : भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सध्या टी-20 ट्रायसीरिज सुरु आहे. या सीरिजमध्ये भारत आणि बांगलादेशच्या मॅचमध्ये बांगलादेशचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

सोमवारी बांगलादेशचं प्रवासी विमान नेपाळमध्ये क्रॅश झालं. युएस-बांगला एअरलाईनचं विमान सोमवारी नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर रनवेवरून घसरलं. या विमान अपघातात ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. या विमानातमध्ये ६७ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर होते.

या विमान अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बांगलादेशचे खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर शोकही व्यक्त केला आहे.