ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० पावसामुळे रद्द

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० पावसामुळे रद्द झाली आहे. 

Updated: Oct 13, 2017, 08:37 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० पावसामुळे रद्द  title=

हैदराबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० पावसामुळे रद्द झाली आहे. हैदराबादमध्ये पडलेल्या पावसामुळे मैदान खेळासाठी योग्य नसल्यानं ही मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे तीन टी-२०ची ही सीरिज १-१नं बरोबरीत सुटली आहे.

पहिल्या टी-२०मध्ये भारताचा विजय झाल्यावर दुसऱ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियानं जोरदार कमबॅक करत मॅच जिंकली. सीरिज १-१नं बरोबरीमध्ये असल्यामुळे या मॅचला महत्त्व प्राप्त झालं होतं, पण पावसानं खेळ केल्यामुळे मॅच जिंकून सीरिज खिशात टाकण्याचं विराट सेनेचं स्वप्न भंगलं.

भारतानं आजचा सामना जिंकला असता तर ७० वर्षात जे झाले नाही ते पहिल्यांदाच झालं असतं . भारताने ऑस्ट्रेलियासोबत खेळलेल्या याआधीच्या तिन्ही सीरिजमध्ये लागोपाठ विजय मिळवला. २०१६ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच होमग्राऊंडवर टी-२० सीरिजमध्ये ३-० ने मात दिली होती. त्यानंतर त्याच वर्षी भारतात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये २-१ ने भारताने विजय मिळवला होता. तसेच नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमध्ये भारताने कांगारूंना ४-१ ने मात देत सीरिज आपल्या नावावर केली.