रोहितचं शतक, विराटचं अर्धशतक, भारत विजयाच्या उंबरठ्यावर

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

Updated: Jun 15, 2017, 09:15 PM IST
रोहितचं शतक, विराटचं अर्धशतक, भारत विजयाच्या उंबरठ्यावर title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. बांग्लादेशनं केलेल्या २६४ रन्सचा पाठलाग करताना भारताचा स्कोअर ३३ओव्हरमध्ये २०६ रन्स झाला आहे. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे ११वं शतक आहे.

या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि सुरुवातीलाच बांग्लादेशला दोन धक्के दिले. त्यानंतर मात्र तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहीम यांनी बांग्लादेशचा डाव सावरला.

तमीम आणि मुशफिकूरमध्ये तिसऱ्या विकेटसाठी तमीमनं मुशफिकूर रहीमबरोबर १२३ रन्सची पार्टनरशीप केली आणि बांग्लादेशचा डाव सावरला.  तमीम इक्बालनं ८२ बॉल्समध्ये ७० रन्सची खेळी केली. तर मुशफिकूर रहीमनं ८५ बॉल्समध्ये ६१ रन्स केल्या. कॅप्टन मशरफी मोर्तजानं शेवटी फटकेबाजी करून बांग्लादेशला २६४/७ पर्यंत पोहोचवलं. भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि केदार जाधवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाला एक विकेट घेण्यात यश आलं.