भारत वि श्रीलंका तिसरी वनडे, भारत मालिका विजय मिळवणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरी आणि निर्णायक वनडे रविवारी होतेय. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कोण विजयी होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 16, 2017, 04:23 PM IST
भारत वि श्रीलंका तिसरी वनडे, भारत मालिका विजय मिळवणार? title=

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरी आणि निर्णायक वनडे रविवारी होतेय. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कोण विजयी होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.

फलंदाजांची चांगली कामगिरी पाहता भारतीय संघाचे पारडे जड दिसतेय. कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडे मालिकेत विजय मिळवण्याच्या इराद्याने श्रीलंकेचा संघ उद्या मैदानात उतरणार आहे. 

मोहालीमध्ये झालेल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला होता. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात शानदार द्विशतक झळकावले होते. त्याच्या द्विशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या सामन्यात विजयी होत मालिकेत बरोबरी साधली. 

भारताने या मैदानात सात सामने खेळलेत. त्यापैकी एकाच सामन्यात त्यांना हार पत्करावी लागलीये. त्यामुळे विजयाची ही लय या सामन्यातही कायम ठेवण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल. 

सामन्याची वेळ - दुपारी दीड वाजता

भारत :- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर , दिनेश कार्तिक, मनीष पांडे, एम एस धोनी, हार्दिक पंड्या, एम एस वाशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, सिद्धार्थ कौल.

श्रीलंका :- थिसारा परेरा  (कर्णधार) , उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलका, लाहिरू तिरिमन्ने, असेला गुणरत्ने, सदीरा समरविक्रमा, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, सचित पतिराना, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, अकिला धनंजया, चतुरंगा डिसिल्वा, दुष्मंता चामिरा, कुशल परेरा..