मुंबईच्या बॅटिंग ऑर्डर बदलाची मोठी शक्यता

आयपीएलच्या अकराव्या सिझनमध्ये मुंबईचा खेळ खूप खराब होत चालला आहे.

Updated: May 1, 2018, 09:37 PM IST
मुंबईच्या बॅटिंग ऑर्डर बदलाची मोठी शक्यता title=

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या सिझनमध्ये मुंबईचा खेळ खूप खराब होत चालला आहे. मुंबईने आतापर्यंत ७ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत. मुंबईचा सामना आता बंगळुरूसोबत सुरू आहे. मात्र या सामन्यासाठी मुंबईकडून आपल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केला जाऊ शकतो. सूर्यकुमार यादव यांनी सांगितलं की, कॅप्टन रोहित शर्मा, येणाऱ्या सामन्यात वरच्या क्रमात बॅटिंग ऑर्डरला येऊ शकतो. सूर्यकुमार यादव बंगळुरू विरूद्धच्या सामन्याआधी सांगितलं, रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटने हा निर्णय घेतला आहे की, रोहितने खालच्या फळीत खेळावं.

सूर्यकुमार यादव यांनी म्हटलंय की, रोहित शेवटच्या ओव्हर्समध्ये खेळण्याची जबाबदारी घेऊ इच्छीतो, पण तो सर्व नंबर्सवर चांगला खेळत आहे, मागील सामन्यात त्याने सर्व जबाबदारी साकारली होती आणि निश्चित या सामन्यातंही असंच काहीसं पाहण्यास मिळणार आहे.