भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा वाढवली

लंडनमध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना आहे. लंडनमध्ये २०० किमी दूर बर्मिंगममध्ये आज भारताचा पहिला सामना होणार आहे. ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघ थांबला आहे तेथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Updated: Jun 4, 2017, 12:59 PM IST
भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा वाढवली title=

लंडन : लंडनमध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना आहे. लंडनमध्ये २०० किमी दूर बर्मिंगममध्ये आज भारताचा पहिला सामना होणार आहे. ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघ थांबला आहे तेथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार बर्मिंगममध्ये भारतीय टीम हयात रिजेंसी हॉटेलमध्ये थांबली आहे. या हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हॉटेलपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांना लॉकडाऊन करण्यात आलं आहे. खेळाडूंना सांगण्यात आलं आहे की, त्यांनी हॉटेलच्या बाहेर पडू नये. भारतीय क्रिकेट टीम बर्मिंगममध्ये सुरक्षित आहे.