लग्नानंतर विराटने अजिंक्यकडून मागितल्या टिप्स

चार वर्षे रिलेशनशिमध्ये राहिल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. विराट आणि अनुष्काचा इटलीमधील बोर्गो फिनोशिएटो मध्ये हा सोहळा पार पडला.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 15, 2017, 01:48 PM IST
लग्नानंतर विराटने अजिंक्यकडून मागितल्या टिप्स title=

मुंबई : चार वर्षे रिलेशनशिमध्ये राहिल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. विराट आणि अनुष्काचा इटलीमधील बोर्गो फिनोशिएटो मध्ये हा सोहळा पार पडला.

या दोघांच्या लग्नाबाबत मोठा सस्पेंस होता. सोमवारी ११ डिसेंबरला रात्री ९ वाजता अनुष्का आणि विराटने आपल्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि हा सस्पेंस संपवला. 

जसा विराट-अनुष्काने लग्नाचा फोटो ट्विट केला त्यानंतर लगेचच सोशल मीडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. 

लग्नानंतर तीन दिवसांनी विराट आणि अनुष्काने त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले. शुभेच्छा देणाऱ्या मेसेजेसना उत्तर देताना विराट कोहलीने लग्न झालेल्या मित्राकडून टिप्सही मागितल्यात. 

अजिंक्य रहाणे ट्विट करत विराट कोहलीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या कोहलीला रहाणेने शुभेच्छा दिल्या. तसेच लग्न झालेल्यांच्या क्लबमध्ये स्वागत असल्याचे त्याने म्हटले होते. 

अजिंक्य रहाणेच्या या ट्विटला विराटने उत्तर देताना म्हटले, थँक्यू मित्रा, मला तुझ्या टिप्सची वाट बघतोय.