गावात पाणी का नाही

राहुल गांधींचे अडीच तासांत दुष्काळ पर्यटन!

महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी राहुल गांधी साता-यात आले. राहुल गांधींनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. फक्त अडीच तासांत युवराजांनी दौरा आटोपला. तहानलेल्या महाराष्ट्राच्या व्य़था अवघ्या अडीच तासांत राहुल गांधींना कळल्या.

Apr 29, 2012, 09:34 AM IST

दुष्काळ : राहुल यांचे गुळगुळीत आश्वासन

सातारा दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी माण खटाव तालुक्यातल्या जासी गावाला भेट दिली. यावेळी जासी गावच्या सरपंच मिनाक्षी पवार यांनी राहुल गांधी यांच्यासमोर गावक-यांची व्यथा मांडली. तर आम्हाला पैसे नको, कायचं पुरेसं पाणी द्या...अशी व्यथा जासी गावच्या ग्रामस्थांनी राहुल गांधींसमोर मांडली. ग्रामस्थांना आश्वासन देताना राहुल म्हणाले, केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे. दुष्काळ भागातील प्रश्न सोडविण्यात येतील. मी दिल्लीत गेल्यावर याप्रश्नी लक्ष घालीन.

Apr 28, 2012, 01:49 PM IST

राहुल गांधीना प्रश्न, गावात पाणी का नाही?

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाचा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जासी गावाला भेट दिली. पहिल्याचे भेटीत गावकऱ्यांनी राहुल यांनी प्रश्न केला, आमच्या गावात पाणी का नाही? या दौ-यातून दुष्काळग्रस्तांसाठी कोणतल्या ठोस उपाययोजना होणार याकडं लक्ष लागले आहे. केवळ दिखाऊ दौरा नको ठोस उपाययोजना हव्यात ,अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे खासदार उदनयराजेंनी व्यक्त केली आहे.

Apr 28, 2012, 09:23 AM IST