president pranab mukherjee

कार्यकाल संपण्याआधी राष्ट्रपतींनी फेटाळले आणखी दोन दया अर्ज

ऱाष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद सोडण्याआधी आणखी दोन दयाअर्ज फेटाळून लावलेत. प्रणव मुखर्जी याचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल २४ जुलैला संपतोय. मे महिन्याच्या अखेरीस या दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावल्या. 

Jun 18, 2017, 07:43 AM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण : अक्षय कुमार, सोनम कपूर सन्मानित; मराठीचा बोलबाला

‘रुस्तम’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अक्षय कुमारला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार तर मल्याळम अभिनेत्री सुरभी लक्ष्मीने ‘मिनामीनुनगु’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कार मिळाला. 

May 3, 2017, 09:15 PM IST

नवा कायदा : तणावातून केलेला आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही!

आता नव्या कायद्यानुसार मानसिक आरोग्य ढासाळलेल्या व्यक्तींनी आत्महतेचा केलेला प्रयत्न हा गुन्हा नसेल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जीनी यांनी या कायद्याला संमती दिली आहे.

Apr 11, 2017, 12:18 PM IST

राष्ट्रपतींच्या हस्ते शरद पवार, डॉ. जोशी, विराट कोहलीचा पुरस्काराने गौरव

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा त्यांच्या सामाजिक जीवनातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. यासोबतच भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनादेखील पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.

Mar 30, 2017, 09:24 PM IST

व्हिडिओ : नोटाबंदीचे भविष्यात चांगले परिणाम दिसतील -राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जनतेशी संवाद साधला. 

Jan 26, 2017, 08:44 AM IST

डिजिटल व्यवहारांमुळे भ्रष्टाचाराला लगाम बसेल : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

नोटाबंदीच्या दीर्घकालीन परिणाम चांगला असेल. तसेच डिजिटल व्यवहारांमुळे भ्रष्टाचाराला लगाम लागेल, असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात व्यक्त केला.

Jan 26, 2017, 08:41 AM IST

राष्ट्रपती आणि पंतप्रधान जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी राहणार उपस्थित

तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललीता यांची 73 दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी  रात्री 11. 30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं अपोलो हॉस्पिटलनं जाहीर केलं. त्यानंतर अवघी तामिळनाडुची जनता शोकसागरात बुडाली. 

Dec 6, 2016, 10:00 AM IST

लोकसभा, विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घ्या : राष्ट्रपती

देशात एकाचवेळी लोकसभा आणि राज्यांतील विधानसभा निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षांनी विस्तृत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.  

Sep 6, 2016, 09:15 AM IST

देशातील सहिष्णुतेबाबत राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

देशात सहिष्णुता आणि मतांतर मान्य करणे यांचा ऱ्हास सुरु झाला आहे काय याबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. सहिष्णुतेच्या गुणामुळेच भारतीय संस्कृती ५ हजार वर्षे टिकली आहे. तिने नेहमीच मतांतरे आणि मतभेद मान्य केलेत.

Oct 20, 2015, 08:49 AM IST

व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींचं राष्ट्रपतींकडे दया मरणासाठी पत्र

दयामरणाची परवानगी द्या अशी लेखी मागणी करणारं पत्र, व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे. 

Aug 9, 2015, 09:42 AM IST

`सबका साथ, सबका विकास` मोदी सरकारचा अॅक्शन प्लान

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण करत आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषण सुरू आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे, महागाई आणि चलनफुगवट्याचा मुकाबला करणं यासह भाजपाप्रणित एनडीए सरकारच्या प्राधान्यक्रमावर असलेल्या मुद्यांचा समावेश राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आहे.

Jun 9, 2014, 11:44 AM IST

लोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींची सही

भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना यश मिळाले आहे. बहुचर्चित लोकपाल आणि लोकायुक्त विधेयकावर बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे या लोकपाल विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाले आहे.

Jan 2, 2014, 08:09 AM IST

संयमाचा अंत पाहू नका, पाकला राष्ट्रपतींचा इशारा

पाकिस्तानकडून भारताला त्रास देने सुरू आहे. सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात दम भरला आहे. संयमालाही काही मर्यादा असतात. आमच्या संयमाचा कुणीही अंत पाहू नये, असा स्पष्ट इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानला दिला आहे.

Aug 15, 2013, 08:45 AM IST

पाकनं भारताचा मैत्रीचा हात गृहीत धरू नये - राष्ट्रपती

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी पाकिस्तानला स्पष्टपणे समज दिलीय. भारत पाकिस्तानबरोबर मैत्रीसाठी एक पाऊल पुढे टाकायला तयार आहे पण, पाकिस्ताननं मात्र याला भारताचा दुबळेपणा समजू नये, असं म्हणत राष्ट्रपती मुखर्जी यांनी भारताला गृहीत न धरण्याची समज पाकला दिलीय.

Jan 26, 2013, 11:41 AM IST