किशोर कदम आणि प्रेमकविता

अभिनेते, कवी किशोर कदम हे आपल्या सर्वांचेच लाडके कलाकार आहेत.

लोकप्रिय अभिनेते

'नटरंग', 'फॅन्ड्री' अशा अनेक मराठी त्याचसोबत हिंदी चित्रपटांतून, मालिकांतून त्यांनी अभिनय केलाय.

त्यांच्या कवितांचे फॅन्स

त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सौमित्र नावानं त्यांच्या कविता या प्रेक्षकांपर्यंत पोहचतात. त्यांच्या कवितांचेही आपण फॅन आहोत.

कवितांवर भाष्य

त्यातून कवी म्हणून जेवढे ते आपल्या परिचयाचे आहेत. त्यातून त्यांचा कवितांविषयीचा अभ्यासही फार दांडगा आहे.

किशोर कदम यांची मुलाखत

'थिंक बॅंक' या युट्युब चॅनलला त्यांनी एक मुलाखत दिली आहे. ज्यात त्यांनी प्रेम कवितांवर एक भाष्य केले आहे.

Romantic कवी आहात?

कवितांच्या प्रकारांवर ते बोलत होते तेव्हा ते म्हणाले की, ''माझे अनेक मित्र मला तुम्ही Romantic कवी आहात असं म्हणतात. पण कवितेतून प्रेम व्यक्त करणं कमीपणाचं नसतं.''

प्रत्येक माणूस Romantic

''माझं मत विचाराल तर जो माणूस कविता लिहितो तो प्रत्येक माणूस Romantic असतो.

Romantic कवितांवरून जे हिणवतात त्यांना...

''Romantic असल्याशिवाय तुम्हाला कविता लिहिताच येऊ शकत नाही. त्यामुळे Romantic कवितांवरून जे लोक हिणवतात त्यांना कविता कळत नाही असं मला वाटतं'', असं ते यावेळी म्हणाले.

VIEW ALL

Read Next Story