अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार किती मोठं अपयश आले तरी जिंकण्याची प्रेरणा देतील.

संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे.

जीवनात कितीही संकटे आली तरी देखील त्यांच्याशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवायला हवी.

आपल्या जीवणात येणाऱ्या अडीअडचणी वाईट प्रसंग यांनीच आपल्यातील आत्मबळात वाढ होते.

आयुष्यात कोणत्याही कारणास्तव हार मानू नका आणि समस्या कधीही आपला पराभव करू शकत नाहीत.

या जगात एखाद्याला पराभूत करणे खूप सोपे आहे, परंतु एखाद्याला जिंकणे तितकेच कठीण आहे.

कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणे थांबवू नका कारण FAIL म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग.

यशस्वी होण्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही.

पहिल्यांदा जिंकल्यावर आपण आराम करू नये. जर आपण दुसऱ्यांदा हरलो तर लोक म्हणतील की पहिला विजय आपल्याला मिळाला तो फुकाचा होता.

स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत.

VIEW ALL

Read Next Story