भारत-इंग्लंडदरम्यान 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टनममध्ये दुसरा कसोटी सामना सुरु होतोय. तर दुसरीकडे कोलकाता आणखी एक सामना सुरु होत असून याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

कोलकातात रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबई आणि बंगाल आमने सामने असणार आहे. या सामन्यासाठी मुंबई संघात पृथ्वी शॉचं पुनरागमन झालं आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून पृथ्वी शॉ दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने पुढच्या सामन्यासाठी त्याची निवड केली आहे.

5 महिने 18 दिवसांपूर्वी पृथ्वी शॉ आपला शेवटचा सामना खेळला होता. यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाली होती.

पृथ्वी शॉ इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये खेळला होता. 13 ऑगस्टला झालेल्या या सामन्यात त्याला दुखापत झाली

बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्यावर उपचार सुरु होते. आता एनसीएने त्याला खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलं आहे.

पृथ्वी शॉ जुलै 2021 पासून टीम इंडियातून बाहेर आहे. आता रणजी ट्रॉफीत दमदार कामगिरी करत पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करण्याचे त्याचे प्रयत्न असतील.

VIEW ALL

Read Next Story