तुम्ही जास्त गोड खात असाल, तर ५ गोष्टींकडे दूर्लक्ष नको

तुम्ही जास्त गोड खात असाल आणि तुम्हाला खालील सवयी असतील किंवा त्रास जाणवत असेल.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 9, 2017, 05:12 PM IST
तुम्ही जास्त गोड खात असाल, तर ५ गोष्टींकडे दूर्लक्ष नको title=

मुंबई : तुम्ही जास्त गोड खात असाल आणि तुम्हाला खालील सवयी असतील किंवा त्रास जाणवत असेल, तर तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढत तर नाही ना? हे तपासून पाहणे महत्वाचे आहे.

दात दुखी

सतत गोड खाल्ल्याने दात खराब होतात. दातांच्या समस्या निर्माण होतात.

जास्त तहान लागणे

शरीरात पाण्याची कमतरता सतत जाणवते त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

नेहमी आजारी असणे

साखर जास्त झाल्यामुळे प्रतिकारक्षमता कमी होते.

तणाव आणि चिंता वाढणे

रक्तातील साखरेच प्रमाण कमी जास्त होत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते.

वजन वाढणे

रक्तात साखरेच प्रमाण जास्त झालं की वजन वाढते.