वर्षाच्या शेवटच्या कालावधीत तर महाराष्ट्राने अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या रुपाने एक मोठा राजकीय भूकंप अनुभवला.
वर्षाच्या सुरूवातीला राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुका १६ फेब्रुवारी रोजी मतदान झाले, त्याचा १७ रोजी निकाल लागला. याला मिनी विधानसभा म्हणून मानण्यात आले. मुंबई आणि ठाणे महापालिकेवर शिवसेनेने पुन्हा फडकवलेला भगवा, मात्र नाशिक महापालिकेची सत्ता गमावली.
या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष या वर्षाने पाहिला.
काँग्रेसचे नेते यांच्यामागे लागलेले बेहिशेबी मालमत्तेच्या तपासाचे शुक्लकाष्ट, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसची खालावलेली स्थिती आणि आरोपांमुळे कृपाशंकर यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
शिवसेनेचे ठाण्याचे खासदार आनंद परांजपे यांना शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत अचानक हजर करून राष्ट्रवादीने शिवसेनेला एक धक्का दिला.
काँग्रेसमधले राणेसमर्थक माजी आमदार शंकर कांबळी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, आदर्श घोटाळ्याप्रकरणी आदर्श चौकशी आयोगासमोर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विलासराव देशमुख यांची साक्ष, मात्र खऱ्या अर्थाने राजकारणात हे वर्ष गाजले ते सिंचन खात्याच्या श्वेतपत्रिकेवरून आणि मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी या वर्षात छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन बांधकामात कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप केला. सुनील तटकरे यांच्यावर बनावर कंपन्या स्थापन करून रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्याचे आरोप झाले.
राष्ट्रवादीचे राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी झालेली अटक आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा घेतलेला मंत्रीपदाचा राजीनामा आणि पुन्हा हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे न पाठवल्याचे घडलेले नाट्य. याच प्रकरणीच शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना झालेली अटक.
या वर्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन झाले. वरील काही घटनावर टाकलेला हा दृष्टीक्षेप.....
|