)
Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्न झालेल्या अभिनेत्याशी विवाह केला. हिंदी चित्रपटसृष्टीतील ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांचं नाव त्यात सर्वात प्रथम घेतलं जातं. त्यांच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा होते. पण त्यांच्या आयुष्यातील प्रेमकथा मात्र अत्यंत गाजलेली आणि वादग्रस्त ठरली.
हेमा मालिनीच्या सौंदर्यावर तीन दिग्गज कलाकार फिदा झाले होते. पण एकही कलाकार त्यांचं मन जिंकू शकला नाही. यामध्ये सर्वात प्रथम संजीव कुमार होते. 'शोले'तील ठाकूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या संजीव कुमार यांचं मन हेमा मालिनीवर आलं होतं. ‘सीता-गीता’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. संजीव कुमार अतिशय साधं आयुष्य जगणारे होते. पण हेमा मालिनींना त्यांचा हा साधेपणा फारसा भावला नाही. त्यामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.
दुसरा दिग्गज कलाकार म्हणजे अभिनेता राजकुमार. ‘लाल पत्थर’ या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. सुरुवातीला हेमा मालिनींना हा चित्रपट करायचाच नव्हता, पण राजकुमार यांनी त्यांना पटवलं. शूटिंग दरम्यान राजकुमार यांनी त्यांना लग्नाची मागणी देखील घातली होती. मात्र, हेमा मालिनी यांनी त्यांना नाकार दिला. हिंदी चित्रपटांमधील जुन्या काळातील लोकप्रिय हिरो जितेंद्र यांनाही हेमा मालिनी आवडत होत्या. त्या काळात जितेंद्र यांनीही त्यांना लग्नाची ऑफर दिली होती. पण याच वेळी धर्मेंद्र आणि हेमा यांच्यात जवळीक वाढली. त्यामुळे हेमा यांनी जितेंद्रला नकार दिला. पुढे जितेंद्र यांनी 1974 मध्ये शोभाशी लग्न केलं.
चार मुलांचे वडील असलेले धर्मेंद्र हे आधीच विवाहबद्ध होते. पण हेमा मालिनींच्या प्रेमात पडल्यावर त्यांनी धर्म बदलून 1980 मध्ये हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. हे धर्मेंद्र यांचं दुसरं लग्न होतं. यामुळे देओल कुटुंबात वाद निर्माण झाला. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी आणि हेमा मालिनी यांच्यात आजही नातं गोड नाही. अगदी सनी देओलच्या मुलाच्या लग्नालाही हेमा मालिनी आणि त्यांचं कुटुंब उपस्थित नव्हतं.
हेमा मालिनी यांच्या आयुष्यात तीन मोठ्या कलाकारांनी त्यांचा हात मागितला होता पण शेवटी त्यांनी चार मुलांचा बाप असलेल्या धर्मेंद्र यांना आपले जीवनसाथी म्हणून निवडलं. ही प्रेमकथा आजही बॉलिवूडमध्ये गाजते.
FAQ
हेमा मालिनी यांना ९० च्या दशकात कशासाठी ओळखले जायचे?
हेमा मालिनी यांना ‘ड्रीमगर्ल’ म्हणून ओळखले जायचे, कारण त्यांच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा होते. ‘डर’, ‘शोले’, ‘सीता और गीता’ सारख्या हिट चित्रपटांनी त्यांना बॉक्स ऑफिस क्वीन बनवले.
संजीव कुमार यांचे हेमा मालिनींबाबतचे प्रेम कसे सुरू झाले?
‘शोले’मधील ठाकूर म्हणून प्रसिद्ध संजीव कुमार यांचे मन हेमा मालिनीवर ‘सीता-गीता’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आले. त्यांनी लग्नाची मागणी केली, पण हेमा यांना त्यांचा साधेपणा आवडला नाही आणि त्यांनी नकार दिला.
राजकुमार यांनी हेमा मालिनींना लग्नाची मागणी कशी केली?
‘लाल पत्थर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजकुमार यांनी हेमा मालिनींना पटवून चित्रपटासाठी होकार मिळवला आणि लग्नाची मागणी घातली. मात्र, हेमा यांनी त्यांना नाकारले.