)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित आणि अनुभवी अभिनेते मानले जातात. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. वयाच्या 82व्या वर्षीही ते अविश्रांतपणे काम करत आहेत मग ते चित्रपट असो, जाहिराती असोत किंवा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम असोत. अमिताभ बच्चन हे केवळ अभिनयापुरतेच मर्यादित नाहीत, तर ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत. ट्विटर (X) वर ते नेहमीच आपल्या मनातील विचार, अनुभव किंवा जीवनातील एखादी निरीक्षणं शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक ट्विटकडे नेटकऱ्यांचं आणि चाहत्यांचं विशेष लक्ष असतं.
अशातच, पहाटेच्या सुमारास 5 वाजता त्यांनी एक ट्विट शेअर केलं, जे पाहून सर्वच नेटकरी गोंधळले. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं 'या जगात दोन प्रकारचे लोक असतात. अशा दोन्ही लोकांपासून दूर राहावे.' हे ट्विट वाचून चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाली की नेमकं अमिताभ कोणत्या दोन प्रकारच्या लोकांविषयी बोलत आहेत? काहींनी या ट्विटचा अर्थ “दिखावा करणारे आणि खोटे लोक” असा घेतला, तर काहींनी म्हटलं की बिग बी कदाचित आपल्या वैयक्तिक अनुभवावरून हा संदेश देत आहेत.
थोड्याच वेळात त्यांनी दुसरं ट्विट केलं, ज्यात फक्त एकच शब्द होता 'बनावट! बस्स.' या दुसऱ्या ट्विटनंतर चाहत्यांच्या कुतूहलात अजून भर पडली. अनेकांनी कमेंट करून विचारलं 'सर, नेमकं कोण बनावट आहे?', 'हे इंडस्ट्रीसाठी आहे का?', तर काहींनी त्यांच्या विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिल्या. अमिताभ बच्चन यांच्या ट्विट्सचा असा गूढपणा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो, कारण ते नेहमी आपले विचार थोडक्यात, पण गूढ अर्थाने मांडतात. अमिताभ बच्चन यांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर ते अलीकडेच ‘Kalki 2898 AD’ या सुपरहिट चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात त्यांनी प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत अभिनय केला होता. सध्या ते लोकप्रिय टेलिव्हिजन शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) च्या १७व्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत.
हा शो अमिताभ यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. एकेकाळी ते आर्थिक संकटातून जात असताना, याच शोने त्यांना पुन्हा उभं राहण्याची संधी दिली होती. आजही हा कार्यक्रम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडला जातो. मीडियानुसार, ते प्रत्येक एपिसोडसाठी कोटींमध्ये मानधन घेतात. तरीदेखील, त्यांच्या वागण्यातली साधेपणा आणि शिस्त आजही तशीच टिकून आहे. अमिताभ बच्चन यांच्या या गूढ ट्विटनं पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की, वय कितीही झालं तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातली ती गूढ आकर्षकता अजूनही तशीच आहे.
T 5534 - इस दुनिया में दो तरह के लोग होते हैं - दोनों से दूर रहना चाहिए
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 17, 2025
FAQ
अमिताभ बच्चन यांनी नेमकं ट्विट काय केलं होतं?
त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं, 'या जगात दोन प्रकारचे लोक असतात. अशा दोन्ही लोकांपासून दूर राहावे.' आणि नंतर दुसऱ्या ट्विटमध्ये फक्त 'बनावट! बस्स.' असं लिहिलं.
चाहत्यांनी त्यांच्या ट्विटवर कशी प्रतिक्रिया दिली?
चाहत्यांनी मोठ्या उत्सुकतेने प्रतिक्रिया दिल्या. काहींनी यामागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी विनोदी पद्धतीने प्रतिसाद दिला.
अमिताभ बच्चन सध्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसत आहेत?
सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती’ च्या 17व्या सीझनचं होस्टिंग करत आहेत आणि अलीकडेच ‘Kalki 2898 AD’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.