‘रागाच्या भरात...’, ‘ब्राह्मण’ समाजावर आक्षेपार्ह विधानाबद्दल अनुराग कश्यपचा माफीनामा, ‘मी मर्यादा विसरलो...’

Anurag Kashyap Controversy : 'फुले' चित्रपटावरुन सुरू असलेल्या वादामुळे चित्रपट निर्माता – दिग्दर्शक अनुराग कश्यप गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘ब्राह्मण’ समाजावर आक्षेपार्ह विधानाबद्दल अनुराग कश्यपने अखेर माफी मागितली आहे.

नेहा चौधरी | Updated: Apr 22, 2025, 02:39 PM IST
‘रागाच्या भरात...’, ‘ब्राह्मण’ समाजावर आक्षेपार्ह विधानाबद्दल अनुराग कश्यपचा माफीनामा, ‘मी मर्यादा विसरलो...’

Anurag Kashyap Controversy : चित्रपट निर्माता – दिग्दर्शक अनुराग कश्यपने 'फुले' चित्रपटावरील वादाच्या पार्श्वभूमीवर एका वापरकर्त्याला उत्तर देताना "ब्राह्मणांवर लघवी करतील"  असं म्हणलं होतं. ज्यामुळे ब्राह्मण समाज दुखावला होता. यानंतर बराच वादंग झाल्यानंतर अनुराग कश्यपने माफी मागितली आहे. अनुराग कश्यपने आज (मंगळवारी) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यात लिहिलंय की, 'रागात मी माझ्या मर्यादा विसरलो'.

‘मी मर्यादा विसरलो...’

अनुराग कश्यपने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'रागाच्या भरात एखाद्याला उत्तर देताना मी माझ्या मर्यादा विसरलो. मी संपूर्ण ब्राह्मण समाजाबद्दल वाईट बोलला. तो समाज, ज्यातील अनेक लोक माझ्या आयुष्याचा एक भाग राहिले आहेत, ते अजूनही तिथे आहेत आणि खूप योगदान देत आहेत. आज ते सर्व माझ्यामुळे दुखावले आहेत. माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास झाला आहे. मी ज्यांचा आदर करतो अशा अनेक बुद्धिजीवी माझ्या रागामुळे आणि माझ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे दुखावल्या जातात. असे बोलून मी स्वतःच विषयापासून दूर गेलो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

अनुराग कश्यप पुढे म्हणाला की...

ज्यांना मी हे सांगू इच्छित नव्हतो, पण एखाद्याच्या हलक्या कमेंटला उत्तर देताना रागाच्या भरात ते लिहिले.' मी माझ्या सर्व मित्रांची, माझ्या कुटुंबाची आणि समाजाची माझ्या बोलण्याच्या पद्धतीबद्दल आणि अपशब्दांबद्दल माफी मागतो. मी त्यावर काम करेन जेणेकरून ते पुन्हा घडू नये. मी माझ्या रागावर काम करेन. जर मला या विषयावर बोलायचे झाले तर मी योग्य शब्द वापरेन. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल.

यापूर्वीही अनुराग कश्यपने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने म्हटलं होतं की, "ही माझी माफी आहे, माझ्या पोस्टसाठी नाही, तर संदर्भाबाहेर काढलेल्या एका ओळीसाठी आणि द्वेष निर्माण करणाऱ्यांसाठी. तुमच्या मुलीला, कुटुंबाला, मित्रांना आणि सहकाऱ्यांना संस्काराच्या प्रमुखांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळण्याइतकी कोणतीही कृती किंवा भाषण महत्वाचं नाही. म्हणून, जे बोललं गेलं आहे ते परत घेता येणार नाही आणि मी ते परत घेणार नाही. पण जर तुम्हाला कोणाला शिवीगाळ करायची असेल तर ते मला करा, माझ्या कुटुंबाने काहीही म्हटलेलं नाही आणि ते कधीही बोलत नाहीत."