मुंबई : कंगनाचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' 24 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. मात्र करण आणि कंगनाचा वाद पुन्हा पेटला आहे असं दिसतंय. याआधी   करणने  कंगनाच्या 'मणिकर्णिका' चित्रपटाचं कौतुक करताना खूप त्रास सहन करावा लागल्याचं  सांगितलं होतं. नुकतीच करण तिच्या आगामी सिनेमासाठी उत्सुक असल्याचा म्हणाला आहे. यावर  कंगना राणौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरवर निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण जोहर आणि कंगना रणौत यांच्यात 36 चा आकडा आहे हे अख्या इंडस्ट्रीला माहीत आहे. कंगना राणौत अनेकदा करणबद्दल मोठमोठी वक्तव्ये करताना दिसते. पण पहिल्यांदाच असं काही घडलं आहे, जे वाचून तुम्हीही म्हणाल की दोघांमधील भांडण संपलं की काय असं वाटेल. होय, कंगना राणौत, जी तिच्या आगामी 'इमर्जन्सी' या दिग्दर्शनाच्या पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे.


करण जोहरच्या वक्तव्यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे. नुकतंच करण जोहरने सांगितलं होतं की, देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर बनत असलेला चित्रपट पाहण्यात मला रस आहे. करण जोहरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो 'इमर्जन्सी' पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. करणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. आता कंगना रणौतने करण जोहरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे, जिथे तिने पुन्हा एकदा त्याच्यावर टीका केली आहे. कंगनाने सांगितले की, करण जोहरने गेल्या वेळी तिच्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे कौतुक केलं होतं, तेव्हा चित्रपटाचं मोठं नुकसान झालं होतं.


अभिनेत्रीने  ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने म्हटलं आहे की, 'मागील वेळी जेव्हा करणने  सांगितलं की, तो 'मणिकर्णिका' पाहण्यासाठी उत्साहित आहे, तेव्हा रिलीजच्या वीकेंडपर्यंत माझ्याविरोधात एक निरुपयोगी मोहीम सुरू करण्यात आली होती. चित्रपटात काम केलेल्या जवळजवळ सर्व मुख्य कलाकारांना आणि मला बदनाम करण्यासाठी आणि चित्रपटाची तोडफोड करण्यासाठी पैसे दिले गेले आणि अचानक माझ्या आयुष्यातील सर्वात यशस्वी वीकेंड माझ्यासाठी एक भयानक स्वप्न बनला... हा हा मला आता खूप भिती वाटतेय... कारण तो पुन्हा उत्साहित झाला आहे.


तुम्हाला माहिती आहे की, मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसीमध्ये केवळ कंगना राणौत अभिनयच नाही तर दिग्दर्शिकादेखील आहे. हा अभिनेत्रीचा दिग्दर्शिका म्हणून पहिलाच सिनेमा आहे. मात्र या चित्रपटानंतर कंगना राणौतला अनेक वादांना सामोरे जावं लागलं होतं. सोनू सूदनेही या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती पण नंतर कंगना रणौतच्या मनमानीमुळे त्याने चित्रपट सोडला.