विराट आणि अनुष्का लंडनमध्ये का झाले शिफ्ट? माधुरी दीक्षितचा नवरा कारण सांगत म्हणाला, 'ते भारतात..'

Dr Nene tells why Virat and Anushka Left India : विराट आणि अनुष्का शर्मा भारतसोडून लंडनमध्ये का स्थायिक झाले? 

दिक्षा पाटील | Updated: Apr 26, 2025, 06:17 PM IST
विराट आणि अनुष्का लंडनमध्ये का झाले शिफ्ट? माधुरी दीक्षितचा नवरा कारण सांगत म्हणाला, 'ते भारतात..'
(Photo Credit : Social Media)

Dr Nene tells why Virat and Anushka Left India : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्याविषयी नेहमीच चर्चा होतात. ते जे काही करतात त्याकडे सगळ्यांचे लक्ष जाते. ते दोघं त्यांच्या मुलांसोबत लंडनमध्ये शिफ्ट झाले आहेत. दोघांनी अनेकदा लंडनमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. दरम्यान, आता माधुरी दीक्षितचा नवरा डॉक्टर नेने यांनी त्यांच्या एका पॉडकास्टमध्ये रणवीर अलाहाबादियाशी बोलताना लंडनमध्ये राहण्याविषयी चर्चा केली. त्यावेळी लंडनच्या आयुष्याविषयी बोलताना अनुष्का आणि विराट हे लंडनमध्ये राहत असल्याचे सांगितले. 

विराट अनुष्काविषयी काय म्हणाले डॉक्टर नेने

श्रीराम नेने यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर रणवीर अलाहाबादियाला बोलावलं होतं. त्यावेळी बोलत असताना रणवीर आणि डॉक्टर नेने यांनी विराटची स्तुती केली. त्यानंतर डॉक्टर नेने यांनी सांगितलं की 'मी त्याचा (विराट कोहली) खूप आदर करतो. आम्ही त्याला अनेकदा भेटलोय, तो एक व्यक्ती म्हणून खूप चांगला आहे.' 

लंडनमध्ये का शिफ्ट झाले विराट अनुष्का?

डॉक्टर नेने यांनी पुढे सांगितलं की 'मला तुम्हाला काही तरी सांगायचं आहे. एक दिवस आम्ही अनुष्काशी बोलत होतो आणि ती खूप छान बोलते. ते दोघं तेव्हा लंडनमध्ये शिफ्ट होण्याचा विचार करत होते, कारण इथे भारतात ते त्यांच्या मिळवलेल्या यशाचा आनंद त्यांना इथे घेता येत नव्हता. त्यांना काय वाटत असेल आणि त्यांच्या या अडचणीविषयी आम्हाला खूप चांगलं माहितीये. ते जे काही करतात त्याची चांगलीच चर्चा होते. आम्ही जवळपास थोडे वेगळे येतो. त्यानं म्हटलं की अनुष्का शर्मा आणि विराट खूप चांगले आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलांना सर्वसामान्य आयुष्य द्यायचं आहे.' 

हेही वाचा : आई होण्याआधीच कियारा आडवाणीला सिद्धार्थनं गिफ्ट केली लग्झरी गाडी; कोटींच्या घरात आहे किंमत

दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी 2017 मध्ये लग्न केलं. त्या दोघांचं लग्न हे चर्चेचा विषय होता कारण त्यांनी इटलीमध्ये लग्न केलं होतं. तर 2021 मध्ये अनुष्कानं एका मुलीला जन्म दिला असून तिचं नाव वामिका आहे. तर 2024 मध्ये अनुष्कानं मुलाला जन्म दिला असून त्याचं नाव अकाय आहे.