नातं टिकवण्यासाठी फक्त…; प्रेमाबाबत अमृता खानविलकरने उघडलं गुपित!

Amruta Khanvilkar on relationship: अमृता खानविलकर ने एका मुलाखतीत मनमोकळ्या गप्पा मारत नात टिकवण्यासाठीचे खास टिप्स शेअर केले.  

कावेरी पिंपळे | Updated: Jan 13, 2026, 06:54 PM IST
नातं टिकवण्यासाठी फक्त…; प्रेमाबाबत अमृता खानविलकरने उघडलं गुपित!

मराठी-हिंदी चित्रसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर ने नुकत्याच एका मुलाखतीत लग्न, संसार आणि वैयक्तिक नात्यांबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिने संसार टिकवण्यासाठी मुलांना खास आणि व्यावहारिक सल्ला दिला, जो आजच्या वेगवान जीवनात अत्यंत उपयुक्त ठरतो.

Add Zee News as a Preferred Source

अमृता म्हणाली, 'फक्त प्रेमावरच लग्न टिकत नाही. जर दोघेही कमावते असतील, आणि दोघांच्या कुटुंबियांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतील, तर प्रत्येक गोष्टीवर मोकळेपणाने चर्चा करणे अत्यंत गरजेचे आहे.' तिने स्पष्ट केले की, लग्नात एकमेकांशी संवाद साधणे हीच खरी गुरुकिल्ली आहे.

मुलांना संसार टिकवण्यासाठी तिने विशेष टीप दिली: 'मी मुलांना खूप नम्रतेने सांगते की, कृपया हे सर्व काही इगोवर घेऊ नका. ही गोष्ट तुमच्यासाठीच चांगली आहे. अनेकदा छोट्या गोष्टींचा इगोमुळे मोठा वाद होतो, ज्यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो.'

अमृता पुढे म्हणाली की, आजकाल संवादाचा अभाव आणि एकमेकांबाबत समजूत नसल्यामुळे अनेक घटस्फोट होत आहेत. 'संवाद हे मानवजातीला मिळालेलं एक अनमोल वरदान आहे. प्राणी हे करू शकत नाहीत, पण आपल्याकडे डोके आहे, शब्द आहेत, बोलण्याची क्षमता आहे. फक्त खाणे-पिणे आणि वंश वाढवणे एवढेच नाही; आपण समाजाचा महत्त्वाचा भाग आहोत. त्यामुळे आपल्या नात्यांमध्ये संवाद आणि समजूत याला महत्त्व द्यायला हवे,' असे ती म्हणाली.

अमृता म्हणाली की, बोलून अनेक समस्या सोडवता येतात. "संवाद नसेल तर इगो येऊ शकतो. संवाद हेच संसार टिकवण्याची खरी गुरुकिल्ली आहे. ज्या जोडप्यांमध्ये मोकळ्या मनाने चर्चा होत नाही, तिथे नात्याला टिकाव लागत नाही," असे तिने स्पष्ट केले.

अमृता खानविलकरची ओळख केवळ अभिनयामुळेच नाही तर तिच्या जीवनदृष्टीमुळेही आहे. मराठी चित्रपटसृष्टीत तिने ‘नटरंग’, ‘चंद्रमुखी’, ‘कट्यार काळजात घुसली’ अशा अनेक यशस्वी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर ठसठशीत छाप पाडली आहे. तिचा नृत्यकौशल्य, संवाद आणि नाट्यमय अभिनय प्रेक्षकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे.

सध्या तिने दिलेल्या सल्ल्यामुळे ती केवळ एक अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर जीवनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारी प्रेरणादायी व्यक्ती म्हणूनही लोकप्रिय ठरत आहे. तिने स्पष्ट केले की, संसार टिकवण्यासाठी केवळ प्रेमावर अवलंबून राहणे पुरेसे नाही; संवाद, समजूत आणि एकमेकांबाबत सहानुभूती यांना नात्यात स्थान देणे आवश्यक आहे.

About the Author

kaveri pimpley

कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.

...Read More