SBI Foundation Day: भारतातील एक 200 वर्ष जुनी बँक भारताची तिजोरी आहे. भारताच्या स्वातंत्र्याला चिरडून टाकण्यासाठी सुरू झालेली बँक, जिचे नाव अनेक वेळा बदलले, जिची ओळखही बदलली, ज्या बँकेद्वारे भारताचे स्वतःचे पैसे भारतीयांविरुद्ध वापरले गेले. हीच बँक आज देशातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) असे या बँकेचे नाव आहे. देशातील 50 कोटी लोकांची या बँकेत खाती आहेत. याच बँकेच्या एका खात्यात जमा 67655995000000 रुपये आहेत. खातेदाराचे नाव जाणून शॉक व्हाल. SBI बँकेच्या स्थापनेची कहाणी फारच रंजक आहे.
1978 मध्ये, रिचर्ड वेलेस्ली ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आले. त्यांनी एका वर्षानंतर म्हैसूरवर हल्ला केला. या हल्ल्यात टिपू सुलतानचा पराभव झाला. त्यानंतर दुसरे अँग्लो-मराठा युद्ध सुरू झाले. युद्धादरम्यान इंग्रजांना आर्थिक मदत करण्यासाठी, ईस्ट इंडिया कंपनीने एक बँकिंग व्यवस्था निर्माण केली. या बँकिंग व्यवस्थेद्वारे, भारताचे स्वतःचे पैसे इंग्लंडमार्गे भारतात परत येत होते आणि भारतीयांना फसवण्यासाठी वापरले जात होते. युद्ध संपल्यानंतर, इंग्रजांनी या व्यवस्थेचे बँकेत रूपांतर केले. 1806 मध्ये, इंग्रजांनी निधी देणाऱ्या संस्थेचे नाव 'बँक ऑफ कलकत्ता' ठेवले.
1809 मध्ये ब्रिटिशांनी या बँकेचे नाव बदलून 'बँक ऑफ बंगाल' असे ठेवले. त्यानंतर हळूहळू तिच्या शाखा सुरू होऊ लागल्या. नंतर बँकेचे नियंत्रण इंग्लंडच्या राणीच्या हाती गेले. 1840 मध्ये ब्रिटिशांनी 'बँक ऑफ बॉम्बे' आणि 1843 मध्ये 'बँक ऑफ मद्रास' सुरू केले. 1921 मध्ये या तिन्ही बँकांना एकत्र करून 'इम्पीरियल बँक ऑफ इंडिया' असे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यानंतर 1955 मध्ये तिचे नाव इम्पीरियल बँक ऑफ इंडिया वरून स्टेट बँक ऑफ इंडिया असे बदलण्यात आले. जर आपण बँकेच्या मालकाबद्दल बोललो तर भारत सरकार तिचे मालक आहे. जे एकेकाळी ब्रिटिशांनी सुरू केले होते.
एसबीआयच्या शाखा केवळ देशातच नव्हे तर परदेशातही आहेत. अनेक बँका त्यात विलीन झाल्या. एसबीआयच्या ग्राहकांची संख्या 50 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. परदेशातच नव्हे तर देशातील खेड्यांमध्येही SBI च्या शाखा आहेत. एसबीआय देशाच्या आर्थिक रचनेत कणा म्हणून भूमिका बजावते. ही बँक ग्रामीण आणि शहरी भागात विस्तारत आहे. इतकेच नाही तर ती परदेशातही वेगाने विस्तारत आहे. कर्जाद्वारे बँक देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाची नवी दिल्ली मेवात शाखा 100 वर्षांहून अधिक जुनी आहे. भारत आणि पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी या शाखेत आपली खाती उघडली होती. आजही 100 वर्षांहून जुनी अनेक बँक खाती या बँकेत सुरक्षित आहेत. रायसीना रोड शाखा 4 जानेवारी 1926 रोजी सुरू झाली. दिल्ली वर्तुळाच्या व्यवसायात बँकेची ही शाखा सुमारे 14 टक्के योगदान देते. म्हणजेच सुमारे 70,000 कोटी रुपये. एसबीआय भारतातील सर्वात मोठी बँक आहे. SBI चा भारती बँकिंग सिस्टीममध्ये 23 टक्के वाटा आहे. त्याच वेळी, एकूण कर्ज आणि ठेवी बाजारात SBI बँकेचा 25 वाटा आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
BOT
(20 ov) 164/7
|
VS |
LES
60(14.1 ov)
|
| Botswana beat Lesotho by 104 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BOT
(20 ov) 102/9
|
VS |
LES
96/8(20 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 102/9
|
VS |
OMA
96/8(20 ov)
|
| Match Postponed | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.