केंद्र सरकार आणि तामिळनाडू यांच्यातील भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर, जनसेना पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शुक्रवारी भारताची भाषिक विविधता जपण्याच्या गरजेवर भर दिला. देशाला फक्त दोन नव्हे तर तमिळसह अनेक भाषांची आवश्यकता आहे असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे. काकीनाडा जिल्ह्यातील जनसेना पक्षाच्या 12 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
"भारताला अनेक भाषांची गरज आहे, फक्त तामिळ किंवा दोन भाषांची नव्हे. आपल्या राष्ट्राची अखंडता राखण्यासाठीच नव्हे तर तेथील लोकांमध्ये प्रेम आणि एकता वाढवण्यासाठी आपण भाषिक विविधता स्वीकारली पाहिजे," असं पवन कल्याण यांनी काकीनाडा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर 'हिंदी लादल्या'चा आरोप केला आहे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणच्या (एनईपी) त्रिभाषिक सूत्राची अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे. त्याच दरम्यान पवन कल्याण यांनी हे विधान केलं आहे.
पवन कल्याण यांनी द्रमुक पक्षाचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली. पवन कल्याण यांनी तामिळनाडूच्या राजकारण्यांवर ढोंगीपणाचा आरोप केला. ते म्हणाले की ते "हिंदीला विरोध करतात, परंतु आर्थिक फायद्यासाठी तमिळ चित्रपटांना हिंदीमध्ये डब करण्याची परवानगी देतात".
"मला समजत नाही की काही लोक संस्कृतवर टीका का करतात. आर्थिक फायद्यासाठी त्यांचे चित्रपट हिंदीमध्ये डब करण्याची परवानगी देणारे तमिळनाडूचे राजकारणी हिंदीला विरोध का करतात? त्यांना बॉलिवूडकडून पैसे हवे असतात, पण हिंदी स्वीकारण्यास नकार देतात. हा कसला तर्क आहे?", अशी विचारणा पवन कल्याण यांनी केली आहे.
तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी त्रिभाषा धोरणाबाबत पक्षाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि म्हटलं की, राज्यातील लोकांना तिसरी भाषा त्यांच्यावर लादली जावी असं वाटत नसलं तरी, ते स्वेच्छेने ती भाषा शिकण्यास तयार आहेत.
"आम्ही सतत सांगत आहोत की तिसऱ्या भाषेची आवश्यकता आहे. 14 लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षरी भाषेत स्वाक्षरी केली आहे. तामिळनाडूच्या लोकांना हिंदीसारखी सक्तीची तिसरी भाषा नको आहे, जी काँग्रेसने 1965 मध्ये केली होती," असं अन्नामलाई यांनी एएनआयला सांगितलं.
त्यांनी द्रमुकवर दुटप्पी भूमिका मांडली जात असल्याची टीकाही केली. ते म्हणाले की, द्रमुक नेत्यांनी चालवलेल्या खासगी शाळा हिंदी शिकवतात. सरकारी शाळांमध्ये हिंदी शिकवत नाहीत.
"लोक स्वेच्छेने तिसरी भाषा शिकू इच्छितात, जी ऐच्छिक आहे. तामिळनाडू तयार आहे, फक्त द्रमुक तयार नाही. द्रमुक चालवणाऱ्या सर्व खासगी शाळा तिसरी भाषा शिकवतात; ते हिंदी शिकवतात. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकू नये असं त्यांना का वाटत आहे?", असा प्रश्न त्यांनी केला.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 193/6
|
VS |
NED
176/7(20 ov)
|
| India beat Netherlands by 17 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 199/3
|
VS |
NAM
97(17.3 ov)
|
| Pakistan beat Namibia by 102 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 122/6
|
VS |
SA
123/4(13.2 ov)
|
| South Africa beat United Arab Emirates by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.