काश्मीरमध्ये लष्कराकडून मोठं कोंबिंग ऑपरेशन; 446हून अधिक दहशतवाद्यांना घेतलं ताब्यात

काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केलीय.  दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर छापे मारण्यात आलेत.

नेहा चौधरी | Updated: Apr 27, 2025, 11:03 PM IST
काश्मीरमध्ये लष्कराकडून मोठं कोंबिंग ऑपरेशन; 446हून अधिक दहशतवाद्यांना घेतलं ताब्यात

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आता दहशतवाद्यांना अद्दल घडवायला सुरूवात केलीय. दहशतवाद्यांनी घरं उद्ध्वस्थ केल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या छुप्प्या अड्ड्यावर छापे टाकायला सुरूवात केलीय. तर घातपात कारवायांसाठी मदत करणाऱ्या शेकडो जणांना लष्कराने ताब्यात घेतलाय. (Army conducts major combing operation in Kashmir More than 446 terrorists arrested)

काश्मीरमध्ये लष्कराकडून मोठं कोंबिंग ऑपरेश

446हून अधिक जण ताब्यात

गेल्या 2 दशकातील मोठी कारवाई

काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केलीय.  दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर छापे मारण्यात आलेत. हल्ल्याचा तपास NIA ने आपल्या हातात घेतलाय. तसंच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आलंय. या कारवाईत आतापर्यंत 446 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलंय. एनआयए ने तब्बल 19 ठिकाणी छापे टाकत पुरावे जमा करायला सुरूवात केलीय. यासोबतच जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानला मदत करणारे स्थानिक दहशतवादी सक्रीय असल्याची माहितीही मिळालीय.अशा 14 स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटलीय. कश्मीरमधील गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जातेय. त्यामुळे या दहशतवाद्यांभोवती फास आवळला जाणाराय. 

दहशतवाद्यांचं कोम्बिंग ऑपरेशन 

- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर अॅक्शन मोडवर

- दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केल्यानंतर मोठं कोम्बिंग ऑपरेशन

- 446हून अधिक संशयित ताब्यात

- दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरुन कारवाई

- गेल्या 2 दशकातील सर्वात मोठी कारवाई

- दहशतवाद्यांना मदत करणा-या 14 जणांची ओळख पटली

- तपास काश्मीरपूरता मर्यादित नाही तर दिल्ली पंजाब आणि गुजरातपर्यंत तपास पोहचू शकतो

- संशयास्पद हालचालींवर लष्कराचं बारीक लक्ष आहे

दहशतवाद्यांचं जाळं नष्ट करणं, तसंच भविष्यातील हल्ल्यांना रोखण्यासाठी वेळीच पावले उचलणं हा या कारवाईमागचा मुख्य उद्देश आहे. आणखी काही दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती मिळतेय.