भारताच्या बँकिग क्षेत्रात सर्वात मोठी घडामोड, 4 बँकाचे विलीनीकरण झाले, आरबीआयने काढली अधिसूचना, ग्राहकांच्या ठेवींचे काय होणार

भारताच्या बँकिग क्षेत्रात सर्वात मोठी घडामोडी घडली आहे.  4 बँकाच्या विलीनीकरणाच्या प्रस्ताव मंजूर झाला आहे.  आरबीआयने विलीनीकरण झालेल्या बँंकासाठी अधिसूचना जारी केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 15, 2025, 08:45 PM IST
भारताच्या बँकिग क्षेत्रात सर्वात मोठी घडामोड, 4 बँकाचे विलीनीकरण झाले, आरबीआयने काढली अधिसूचना, ग्राहकांच्या ठेवींचे काय होणार

Bank Merger :  मागील काही महिन्यांपासून भारतात बँक विलीकरणाची चर्चा सुरु आहे. अशातच बँकिंग क्षेत्रात मोठी घडामोड घडली आहे. भारतातील 4 मोठ्या बँकाच्या विलीनीकरणाच्या प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे. आरबीआयने या बँकांच्या विलीनीकरणाबाबतची अधिसूचना जारी केली आहे.  बँकांच्या विलीनीकरणाच्या खातेदारांवर काय परिणाम होईल. विलीनीकरण झालेल्या या बँंका कोणत्या जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुजरातमधील चार बँकांच्या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. विलीनीकरणानंतरही दोन बँका राहतील. स्वतंत्र अधिसूचनेद्वारे विलीनीकरणाला मान्यता देण्यात आली. दोन्ही विलीनीकरणांना बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या तरतुदींनुसार मान्यता देण्यात आली आहे. 15  डिसेंबर 2025 पासून विलीनीकरणाची सूचना लागू झाली आहे.

रिझर्व्ह बँकेने (RBI) चार सहकारी बँकांच्या बँकांमध्ये कपात केली आहे. RBI ने गुजरातमधील चार प्रमुख सहकारी बँकांच्या विलीनीकरणाला अंतिम मान्यता दिली आहे. हे विलीनीकरण आज, 15 डिसेंबर 2025 पासून लागू झाले आहे. RBI च्या या निर्णयानंतर, आता चारही बँका फक्त दोन मजबूत बँका म्हणून एकत्र काम करतील.  गुजरातच्या सहकारी बँकिंग क्षेत्राला नवीन दिशा आणि बळ देणे आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत निवेदनानुसार, हे विलीनीकरण स्वेच्छेने, म्हणजेच संबंधित बँकांच्या परस्पर संमतीने करण्यात आले आहे.

पहिल्या महत्त्वपूर्ण विलीनीकरण योजनेत, द आमोद नागरीक सहकारी बँक अहमदाबाद येथील द भुज मर्कंटाईल सहकारी बँकेत विलीन झाली आहे. हे विलीनीकरण आजपासून प्रभावी झाले. आजपासून, द आमोद नागरीक सहकारी बँकेच्या सर्व विद्यमान शाखा आता द भुज मर्कंटाईल सहकारी बँकेच्या शाखा म्हणून काम करतील. हे विलीनीकरण बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 44अ अंतर्गत करण्यात आले आहे, जे दोन बँकांच्या स्वेच्छेने विलीनीकरणाची प्रक्रिया सुलभ करते.

आणखी एका मोठ्या विलीनीकरणात, अमरनाथ सहकारी बँकेचे कालूपूर कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेत विलीनीकरण झाले आहे. या विलीनीकरणानंतर, अमरनाथ सहकारी बँकेच्या सर्व शाखा आता कालूपूर कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखा म्हणून काम करतील.

ग्राहकांच्या ठेवींचे काय होईल?

रिझर्व्ह बँकेने (RBI) विलीनीकरणाला मान्यता दिल्यानंतर, ग्राहकांच्या  ठेवी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. या संदर्भात, RBI ने ग्राहकांना महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. RBI ने स्पष्ट केले आहे की या विलीनीकरणाचा बँकांच्या विद्यमान ग्राहकांवर नकारात्मक परिणाम होणार नाही. बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीतपणे सुरू राहतील.

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More