भारत-पाकिस्तान संघर्षानंतर बॉलिवूडही सावध; रात्रीची झोप उडाली तरी... सूचक पोस्ट करत वेधलं लक्ष

Bollywood Celebrity on India-Pakistan War : भारत-पाकिस्तान संघर्षावर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुचक पोस्ट... 

दिक्षा पाटील | Updated: May 9, 2025, 08:18 AM IST
भारत-पाकिस्तान संघर्षानंतर बॉलिवूडही सावध; रात्रीची झोप उडाली तरी... सूचक पोस्ट करत वेधलं लक्ष
(Photo Credit : Social Media)

Bollywood Celebrity on India-Pakistan War : पाकिस्तानकडून दुसऱ्या दिवशी देखील भारतावर हल्ला करण्यात येत आहे. काल पाकिस्ताननं पंजाब आणि जम्मूसोबत इतर ठिकाणांवर देखील निशाणा साधण्याचे प्रयत्न केले पण भारतानं ते सगळे हल्ले परतावून लावले आहेत. त्यानंतर भारताकडून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. या सगळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हे भारतीय सैनेचं कौतूक करताना दिसत आहेत. या सगळ्यात कंगना रणौत, अनुपम खेर, रिचा चड्ढा, कॉमेडियन वीर दास, अनिल कपूर, श्रद्धा कपूर, अंगद बेदी, मिनी माथूर अशा अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर केल्या आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून लिहिले की 'जम्मू टार्गेटवर आहे' आणि त्यानंतर तिनं 'घाबरू नका #Jammu' असं म्हटलं.

bollywood celebrity on India Pakistan war

रिचा चड्ढानं इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत म्हटलं, 'ही काही मॅच नाही किंवा हा काही खेळ नाही. युद्ध हे गंभीर असतं... प्रत्येक गोष्ट हास्यास्पद किंवा मीम पोस्ट नसावी. कृपया थोडा विचार करा. सीमेवर राहणाऱ्यांच्या मनात काय भीती असते हे समजून घ्या.'
 

bollywood celebrity on India Pakistan war

कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास यानं देखील पोस्ट केली आहे. वीर दासनं त्याच्या X अर्थात आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये तो म्हणाला, 'आपण आता इथे बोलत असताना ज्यांचं कुटुंब आणि मित्र हे सध्या या ब्लकआऊटमध्ये आहेत. आम्ही तुमचाच विचार करतोय आणि तुमच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांची जी सुरक्षा करत आहेत त्यांचे आम्ही आभारी आहोत. आभार, प्रार्थना आणि आदर तुम्हाला. सुरक्षित राहा. 

अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून लिहिलं की, 'जे सैनिक महिला आणि पुरुष आपली सुरक्षा करत आहेत त्यांचे आभार मानतो आणि प्रार्थना करतो. तुम्ही आमचे खरे हिरो आहात.'
 

bollywood celebrity on India Pakistan war

अनुपम खेर यांनी आधीच्या ट्विटर अर्थात X अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली की 'माझा चुलत भाऊ सुनील खैर हा जम्मुमध्ये राहतो त्यानं त्याच्या घराच्या इथून हा व्हिडीओ शेअर केला आहे. मी लगेच त्यांना फोन करून विचारलं की ते लोकं सुरक्षित आहेत ना? तो हसला आणि म्हणाला आमची सुरक्षा भारतीय सेना आणि माता वैष्णो देवी करत आहे. चिंता करू नका. मिसाईल खाली लागू देत नाहीयेत. जय माता दी! भारत माता की जय!'

श्रद्धा कपूर हिनं पोस्ट केलं, 'आपल्या रक्षणकर्त्यांचा अभिमान आहे. जय हिंद.'
 

bollywood celebrity on India Pakistan war

तनिशा मुखर्जी हिनं म्हटलं, 'हे युद्ध थांबवा. आपली सुंदर भूमी आणि लोकं नष्ट करू नका. #JammuKashmir #MissileAttacks'
 

bollywood celebrity on India Pakistan war

अंगद बेदीनं लिहिलं, 'वाहेगुरू सगळ्यांना सुखी ठेवो. हे सर्व सहन करण्याची ताकद देवो.'
 

bollywood celebrity on India Pakistan war

मिनी माथूर हिने लिहिलं, 'रात्री झोप येणार नाही. सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू.'
 

bollywood celebrity on India Pakistan war

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारतावर हल्ले करण्याचे प्रयत्न केले खरे. मात्र, हे सर्व हल्ले भारतानं उधळून लावले. एकिकडून भारतीय सैन्यदल, दुसरीकडून वायुसेना आणि तिथं सागरी मार्गानं भारतीय नौदलानं पाकिस्तानची कोंडी केली.