भोपाळ - लग्न हे एक पवित्र बंधन आहे. लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं. एकमेकांवर विश्वास असला की लग्नाचं हे बंधन जगातलं सगळ्यात सुंदर नातं होतं. पण विश्वास तुटला की सगळंच संपतं. जर या नात्यात दुसरं कोणी आलं तर आयुष्यावरील विश्वास संपून जातो आणि त्यात जर हे दुसरं कोणी आपला जवळचा व्यक्ती असेल तर हा धक्का सहन करणं कठीण होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच एक घटना समोर आली आहे. एका नवविवाहित तरुणाने जो प्रताप केला त्यानंतर नात्यांवरील विश्वासच उडून जातो. या तरुणाने नात्यांची हद्दच पार केली. झालं असं की, लग्नानंतर बायको पहिल्यांदा माहेरी गेली होती. दीड महिन्यानंतर नवरा बायकोला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला आणि त्याने नात्याची मर्यादा ओलांडली. म्हणतात 'साली तो आधी घरवाली होती है. या तरुणाने या वाक्याला फारच मनावर घेतलं आणि बायकोच्या छोट्या बहिणीला घेऊन तो पळून गेला. 


विवेक शुक्ला असं या तरुणांचं नाव आहे. 10 मे 2022 मध्ये त्याचं शिवानी या तरुणीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर ती पहिल्यांदाच माहेरी गेली. विवेक आणि शिवानीचं रोज फोनवर बोलणं होतं होतं. मात्र तो तिला घ्यायला माहेरी गेल्या त्यानंतर विवेकने जे कृत्य केलं ते संतापजनक होतं. मध्य प्रदेशातील सागरमधील ही धक्कादायक घटना आहे. 


शिवानी हिने नवरा विवेक आणि बहिण निकिताविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर शिवानीला तिच्या नवऱ्यासोबत राहायचं नाही आहे. निकिताने विवेकसोबत संसार करावा असं पीडित पत्नीची इच्छा आहे. पण विवेकची पत्नी म्हणून माझ्यासोबत जो धोका झाला त्यासाठी विवेकला शिक्षा व्हावी अशी तिची मागणी आहे.