अबु आझमींवर योगी आदित्यनाथ आक्रमक, ‘त्याला यूपीत पाठवून द्या, आम्ही…’

अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातही राजकारण तापलं आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Mar 5, 2025, 04:53 PM IST
अबु आझमींवर योगी आदित्यनाथ आक्रमक, ‘त्याला यूपीत पाठवून द्या, आम्ही…’

Yogi Adityanath On Abu Azmi : अबू आझमी यांनी औरंगजेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात चांगलंच राजकारण तापलं आहे. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं त्यानंतर आता महाराष्ट्रात पडसाद उमटले. आज विधानसभेत देखील याच मुद्यावरून पडसाद उमटले. विरोधकांनी आंदोलन करत अबू आझमी यांच्यावर कारवाईची देखील मागणी केली. यानंतर अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्यात आली. अशातच अबू आझमी यांच्या वक्तव्याचे पडसाद उत्तर प्रदेशमध्येही बघायला मिळाले.

Add Zee News as a Preferred Source

औरंगजेब वादावरून उत्तर प्रदेश विधान परिषदेत योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. विधान परिषदेत योगी आदित्यनाथ म्हणाले की, समाजवादी पक्ष औरंगजेबाला आपला आदर्श मानतो. योगी आदित्यनाथ यांनी बोलताना कोणाचेही नाव न घेता सांगितले की, 'कंबख्तको उत्तर प्रदेश भेज दो, इलाज हम करेंगे' असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

काय म्हणाले योगी आदित्यनाथ? 

पुढे योगी आदित्यनाथ म्हणाले की, भारतावर हल्ला करणाऱ्या धर्मांध आणि क्रूर शासकाला समाजवादी पक्ष आदर्श मानतो. कोणत्याही सुसंस्कृत मुस्लिमानेही आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवलेले नाही. औरंगजेबाबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, हा हिंदू तुमच्यापेक्षा चांगला आहे. जो जिवंतपणी आपल्या आई वडिलांची सेवा करतो आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कार करतो असं योगी आदित्यनाथ म्हणाले. 

अबू आझमी यांनी मागितली माफी

विधानसभेत अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अबू आझमी यांना संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या या विधानावरून गेल्या दोन दिवसांपासून राजकारण तापले होते. दरम्यान, अबू आझमी यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. ते म्हणाले की, ते फक्त इतिहासात जे लिहिले आहे तेच बोलत आहेत. या टिप्पणीमुळे अबू आझमी यांना त्यांच्या विरोधकांकडून सतत लक्ष्य केले जात आहे. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More