भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर कोणता देश कोणाला साथ देईल? दोन देशांची नाव जाणून धक्का बसेल

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर कोणता देश कोणाला साथ देईल अशी चर्चा रंगली आहे. या चर्चेत दोन देशांच्या नावांची जास्त चर्चा आहे. 

वनिता कांबळे | Updated: Apr 27, 2025, 11:40 PM IST
  भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर कोणता देश कोणाला साथ देईल? दोन देशांची नाव जाणून धक्का बसेल

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये  मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. भारत सरकार कठोर पावले उचलली आहेत. भारत सरकाने सिंधू पाणी करारावर बंदी घालण्याची घोषणा केली. तसेच, आता पाकिस्तानच्या कोणत्याही नागरिकाला भारतात प्रवेश मिळणार नाही. दुसरीकडे, या निर्णयानंतर पाकिस्तानकडूनही अनेक प्रक्षोभक विधाने केली जात आहेत. भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव खूपच वाढला आहे.  जर भविष्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा लढले किंवा युद्ध झाले तर जगातील कोणते देश कोणत्या बाजूने असतील जाणून घेऊया. 

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर भारताला दोन आघाड्यांवर लढावे लागू शकते. याचे कारण म्हणजे चीन सतत पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे करत आहे. जर असे झाले तर भारतासाठी काहीशी कठिण स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, चीन नेमकी या भूमिका घ्यायची याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेऊ शकते.  कारण आता भारत एक मोठी शक्ती बनला आहे. 1962 पासून परिस्थिती खूप बदलली आहे. 

इतिहासावर नजर टाकल्यास  चीनला कधीही पाकिस्तानला भारताशी लढणे योग्य वाटले नाही. 1965 आणि 1971 च्या युद्धांमध्ये सर्वांना असे वाटत होते की  चीन दुसऱ्या बाजूने हल्ला करेल, पण तसे झाले नाही. चीनने या दोन्ही युद्धांमध्ये स्वतःला दूर ठेवले तसेच थेट सहभागी घेतला नाही. चीनने आपली भूमिका उघडपणे स्पष्ट केली नसली तरी चीन आणि पाकिस्तानमधील मैत्री अधिकच घट्ट झाली आहे. 

कोणते देश भारताला पाठिंबा देतील?

भारताची गिणती जगातील जगातील शक्तीशाली देशांमध्ये होते.  जगात एक बलवान देश म्हणून भारताने स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. भारताचे बहुतेक मोठ्या देशांशी खूप चांगले संबंध आहेत. यामध्ये सर्वात मोठा देश अमेरिका आहे. ज्याला महाशक्ती म्हटले जाते. अमेरिकेशी भारताचे खूप चांगले संबंध आहेत. दोन्ही देश एकमेकांशी विविध प्रकारचे व्यापार करतात. 

गेल्या काही वर्षांत पाकिस्ताननेही अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु दहशतवाद आणि इतर गोष्टींमुळे अमेरिका पाकिस्तानला फारसे महत्त्व देत नाही. अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू ओसामा बिन लादेन देखील अनेक वर्षे पाकिस्तानात लपून बसला होता. यामुळे अमेरिका पाकिस्तान कधीच जवळ करणार नाही. 

रशिया आणि इस्रायलचा पाठिंबा 

रशिया आणि इस्रायल या दोन देशांच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचे लक्ष राहील. अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शक्ती असलेल्या रशियाकडूनही भारताला पाठिंबा मिळू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून रशिया आणि भारताचे संबंध खूप चांगले आहेत, भारताने रशियाकडून अनेक मोठी शस्त्रे खरेदी केली आहेत.  भविष्यातही असे करार सुरू राहतील. पाकिस्तानसोबतच्या युद्धादरम्यान, रशियाने उघडपणे भारताला पाठिंबा दिला आणि अमेरिकन नौदलाच्या ताफ्याला परत पाठवण्यास भाग पाडले. 

मागील अनेक वर्षांपासून इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंधही मजबूत आहेत.  कारगिल युद्धादरम्यान इस्रायलने भारताला खूप मदत केली होती. या दरम्यान, इस्रायलने नाईट व्हिजन कॅमेरे, ड्रोन आणि इतर तांत्रिक गोष्टी पुरवल्या. 
पाकिस्तानला एकटा पडू शकतो.

एकंदरीत, अशा परिस्थितीत, चीन वगळता, दुसरा कोणताही मोठा देश भारतासाठी धोका ठरु शकत नाही. जर पाकिस्तानने भारताशी पंगा घेतला तर त्याला फक्त चीनवर अवलंबून राहावे लागेल. पाकिस्तान मुस्लिम देशांकडूनही मदत मागू शकतो, परंतु कोणताही इस्लामिक देश भारताविरुद्ध युद्धसदृश परिस्थिती निर्माण करेल अशी शक्यता खूपच कमी आहे. दुसरीकडे, जर चीनने भारताला पाठिंबा दिला नाही, तर युद्धात पाकिस्तानच्या बलुचिस्तानपासून पीओकेपर्यंतचा भाग भारत अगदी सहज काबीज करु शकतो.