India Pakistan War: पाकिस्ताननं गुरूवारी भारताच्या जम्मूत केलेल्या हल्ल्यात मोठं नुकसान झालंय.पूँछ, उरी, कुपवाडा, राजौरला पाकिस्ताननं टार्गेट केलं होतं. दरम्यान पाकचा हा कट भारतानं उधळून लावलाय.भारतानं पाकिस्तानला घरात घुसून मारलं. त्यानंतर दहशतवाद्यांचा पाठिराखा चवताळलेला पाकिस्ताननं भारताच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केलं. मात्र, पाकिस्तानचा हा कट भारताच्या लष्करानं उधळून लावला. पाकिस्ताननं जम्मू काश्मिरला टार्गेट करण्याचा प्लॅन केला होता. जम्मूच्या सीमाभागात पाकिस्ताननं केलेल्या जोरदार गोळीबारामुळे मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय.
जम्मूच्या पूँछ आणि कुपवाड्यात पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात मोठं नुकसान झालंय. अनेक घरांचं गोळीबारामध्ये नुकसान झालं. थेट घरांमध्ये देखील गोळ्या शिरल्याचं दृश्यांमधून दिसतंय. तर तिकडे कुपवाड्यात तोफ-गोळ्यांच्या हल्ल्यानं घराच्या भींती पडल्या आहेत. जम्मूच्या सांबा आणि उरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात नुकसान झालंय. सांबात अनेक घरांमध्ये गोळ्या शिरल्यात तसंच रात्रभर गोळीबाराचा आवाज सुरू असल्याचं इथल्या स्थानिकांनी सांगितलंय. उरीमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. उरीमध्ये गाड्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.
राजौरी, बारामुल्लाला देखील पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलं होतं. या भागात देखील रात्री ब्लॅक आऊट घोषित करण्यात आला होता. पाकिस्ताननं या परिसरात जोरदार गोळीबार केला होता. यामुळे काही काळ या ठिकाणी भीतीचं वातावरण असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय.
पाकिस्ताननं केलेले हल्ले भारतानं परतवून लावले आहेत. तसंच पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल्स भारतानं हवेतच हाणून पाडलेत त्यामुळे पाकिस्तानचा कट भारतानं उधळून लावला आहे. पाकिस्तानला भारताच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करायचा होता. अशी माहिती भारतीय लष्करी अधिका-यांनी दिलीय. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा भारतानं बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवला. तरीही पाकिस्तान सुधारला नाही. त्यानं पुन्हा भारतावर हल्ला केला. मात्र, या हल्ल्यात पाकिस्तानचंच मोठं नुकसान झालंय.