भारतीय जवानांपुढं पाक एअरफोर्सचे AWACS फेल; भारताने उद्ध्व्स्त केले पाकिस्तानचे 6 फायटर जेट

India Pakistan War: ऑपरेशन सिंदूरनंतर गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने भारतातील अनेक भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 9, 2025, 06:52 AM IST
भारतीय जवानांपुढं पाक एअरफोर्सचे AWACS फेल;  भारताने उद्ध्व्स्त केले पाकिस्तानचे 6 फायटर जेट
India Pakistan War Pakistan F-16 Shot Down By Indian Surface-To-Air Missile

India Pakistan War: भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील तणाव वाढत चालला आहे. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाक बिथरला आहे. मंगळवारी रात्री पाकने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. त्यानंतर रात्रीपासून सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असून जवानांकडूनही प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे. भारतीय सेनेने पाकिस्तानचे 3 JF-17 आणि एक D-16 फायटर जेट उद्ध्व्स्त केले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान एअरफोर्सचे AWACS विमान त्यांच्या पंजाब प्रांतात नष्ट केले आहे. हे विमान पाकिस्तानच्या सीमेवरच हाणून पाडलं आहे. 

सीमेवरदेखील ड्रोन हल्ला करत लष्कराने पाकिस्तामच्या एअर डिफेन्स युनिटला सडेतोड उत्तर दिलं आहे. भारत-पाकिस्तान यांच्या वाढत्या तणावदरम्यान पाकिस्तानने गुरुवारी जम्मूस्थित एअरस्ट्रिपवर रॉकेटहल्ला केला होता. मात्र भारतीय सेनेच्या सतर्कतेमुळं हा हल्ला हाणून पाडण्यात यश आले आहे. हवाई दलाने पाकिस्तानचा मनसुबा उधळून लावला आहे. भारतीय सेनेच्या अत्याधुनिक S-400 मिसाइल डिफेन्स सिस्टिमने ताबोडतोब कारवाई करत पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या 8 मिसाईल हवेतच नष्ट करण्यात आल्या आहे. सेनेच्या सूत्रांनुसार, या मिसाईलचे एक टार्गेट जम्मू एअरस्ट्रिप होते. मात्र, वेळीच या कारवाई करत हा हल्ला उधळून लावला आहे. भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स युनिटने पाकिस्तानचे 2 F-16 जेटला नियंत्रण रेषेजवळच उद्ध्व्स्त केले आहे. पाकिस्तानच्या 2 पायलटलादेखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

पाकिस्तानने गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये भारताच्या सीमेवर्ती भागात ड्रोन आणि मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने S-400 आणि आकाश एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच हे जेट नष्ट केले आहेत. त्यामुळं भारताचे कोणतेही नुकसान झाले नाहीये.