Indian Train to Pakistan From Which Station : भारतात रेल्वेतून प्रवास करणे अनेकांना आवडतं. आरामदायी, जलद आणि कमी पैशांत आपण एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर सहज पोहोचू शकतो. भारताच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरलंय. पण तुम्ही कधी विचार केला का की तुम्ही परदेशात रेल्वेने जाऊ शकता. परदेशात जायचं म्हटलं की, डोळ्यासमोर विमान प्रवास येतो. पण थांबा भारतात असे रेल्वे स्टेशन आहेत जे आंतरराष्ट्रीय असून या ठिकाणाहून तुम्हा परदेशात जाऊ शकता.
भारतात प्रत्येक रेल्वे स्टेशनचा आपला असा इतिहास आणि वैशिष्ट्ये आहेत. भारतात अनेक अद्वितीय रेल्वे स्थानके आहेत जी प्रवाशांना थेट शेजारील देशांशी जोडतात. आंतरराष्ट्रीय भेट देण्यासाठी एक सोयीस्कर आणि आकर्षक मार्ग प्रदान करतात. ही स्थानके सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यापार आणि पर्यटन, देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे दुवा मानला जातो. चला जाणून घेऊया भारतातील अशा सात रेल्वे स्थानकांविषयी जे परदेशात थेट रेल्वे सेवा देतात.
आपल्यापैकी बरेच जण नवीन देश आणि त्यांची संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमानाने जाणे ही सर्वात सामान्य पद्धत असताना, तुम्ही रेल्वेनेही सीमा ओलांडू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? होय, भारतात अनेक रेल्वे स्थानके आहेत जी बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान या शेजारील देशांना जोडतात.
बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान सारख्या शेजारील देशांना जोडणारी अनेक रेल्वे स्थानके आहेत. ही स्थानके सीमापार प्रवास सुलभ करतात आणि ट्रेनद्वारे आंतरराष्ट्रीय गंतव्ये पाहण्याची अनोखी संधी देतात.
हेसुद्धा वाचा GK: कोणता प्राणी तोंडाने पिल्लं जन्माला घालतो? आपल्या आजुबाजूलाच असूनही 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
1. हल्दीबारी रेल्वे स्टेशन (कूचबिहार, पश्चिम बंगाल), येथून ट्रेन बांगलादेशला जाते.
2. जयनगर रेल्वे स्टेशन (मधुबनी, बिहार), येथून ट्रेन नेपाळला जाते.
3. पेट्रापोल रेल्वे स्टेशन (उत्तर 24 परगणा, पश्चिम बंगाल), येथून ट्रेन बांगलादेशला जाते.
4. सिंगाबाद रेल्वे स्टेशन (मालदा, पश्चिम बंगाल), येथून ट्रेन बांगलादेशला जाते.
5. जोगबनी रेल्वे स्टेशन (अररिया, बिहार), येथून ट्रेन नेपाळला जाते.
6. राधिकापूर रेल्वे स्टेशन (उत्तर दिनाजपूर, पश्चिम बंगाल), येथून ट्रेन बांगलादेशला जाते.
7. अटारी रेल्वे स्टेशन (अमृतसर, पंजाब), येथून ट्रेन पाकिस्तानला जाते.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.