पाकिस्तानने विनाकारण पाठवले नाहीत विना शस्त्रांचे ड्रोन; यामागे मोठा कट; MEA ने केला खुलासा

पाकिस्तानने काल रात्री 8 मे रोजी भारताच्या सुरक्षा ठिकाणांची माहिती मिळवण्याच्या हेतूने मिसाईल आणि ड्रोन डागले होते अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: May 9, 2025, 10:46 PM IST
पाकिस्तानने विनाकारण पाठवले नाहीत विना शस्त्रांचे ड्रोन; यामागे मोठा कट; MEA ने केला खुलासा

पाकिस्तानने गुरुवारी रात्री 8 मे रोजी भारताच्या सुरक्षा ठिकाणांची माहिती मिळवण्याच्या हेतूने मिसाईल आणि ड्रोन डागले होते अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानने संभाव्यपणे तुर्कीच्या ड्रोन्सचा वापर केला होता असंही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. पाडलेल्या तसंच निष्क्रीय करण्यात आलेल्या ड्रोन्सची पाहणी करण्यात आली असता, हे ड्रोन तुर्कीच्या 'Assisguard Songar' मॉडेलचे होते, ज्यांचा वापर खासकरुन लक्ष ठेवण्यासाठी आणि योग्य ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी केला जातो. 

'भारताला टार्गेट करण्यासाठी पाकिस्तानकडून रात्री 300 ते 400...', कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा

 

विंग कमांडर व्योमिका सिंह ने बताया, "8 आणि 9 मे च्या रात्री, पाकिस्तानी सैन्याने लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने संपूर्ण पश्चिम सीमा भागात अनेक वेळा भारतीय हवाई हद्दीचं उल्लंघन केलं". 'पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर (एलओसी) कॅलिबर शस्त्रांनी गोळीबार केला असंही त्यांनी सांगितलं. 

'भारताच्या सुरक्षा ठिकाणांची तपासणी करण्याचा हेतू'

सीमेवर मोठ्या प्रमाणात ड्रोनच्या माध्यमातून घुसखोरीचा प्रयतन कऱण्यात आला. त्यांनी सांगितलं की, "आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर लेहपासून ते सिर क्रीकपर्यंत 36 जागांवर 300 ते 400 ड्रोन आणि इतर मार्गांनी घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला".

या हल्ल्यांचा हेतू भारतीय हवाई दलाची क्षमता तपासणं आणि गुप्त माहिती एकत्र करणं होता. पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून भारतीयांमध्ये भिती पसरवण्याचा हेतू होता. यासह भारतीय लष्कराच्या ठिकाणांची माहिती मिळवणंदेखील असू शकतो. यामधील अनेक ड्रोन विनाशस्त्र होते. 

ते म्हणाले, 'पाकिस्तानचा एक सशस्त्र यूएव्ही (ड्रोन) भटिंडा येथील लष्करी तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असताना परिस्थिती अधिक गंभीर झाली, परंतु ते वेळीच नष्ट करण्यात आले.' या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, 'पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने चार पाकिस्तानी हवाई संरक्षण स्थळांवर सशस्त्र ड्रोन पाठवले, त्यापैकी एकाने हवाई संरक्षण रडार नष्ट केला.'