Pahalgam Attack Update: पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भयानक क्रूर दाखवणारा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये, एक माणूस झिपलाइनचा आनंद घेताना दिसत आहे अन् खाली जमिनीवर दहशतवादी त्यांच्या भयान कृत्य करत आहेत. या व्हिडीओमधील पर्यटकाने त्या दिवशी घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, त्या दिवशी अचानक गोळीबाराचे आवाज येऊ लागतात. झिपलाइन ऑपरेटर मुजम्मिल हळू आवाजात 'अल्लाह-हू-अकबर' चा नारा देऊ लागला. पुढे पर्यटक म्हणला की, तो ही दुर्दैवी घटना समजू शकत नाही. तो उत्साहित दिसत होता. मुझम्मिलच्या घोषणेचा त्याला निश्चितच त्रास झाला कारण इतर लोकांना झिपलाइनवर सोडताना, मुझम्मिल काहीही बोलला नाही आणि तो सामान्यपणे वागत होता. अचानक त्याचे वर्तन असामान्य वाटले.'
पर्यटकाच्या दावानंतर एनआयएने सोमवारी संध्याकाळी मुझम्मिलला पुन्हा पहलगाम पोलीस ठाण्यात बोलावले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, व्हिडीओ समोर येण्यापूर्वीच, एनआयएने मुझम्मिलला झिपलाइन ऑपरेटर असल्याबद्दल आणि घटनास्थळी उपस्थित असल्याबद्दल आधीच चौकशी केली होती. एनआयएच्या सूत्रांनुसार, मुझम्मिलचे जयजयकार ही धक्कादायक किंवा अचानक घडणाऱ्या गोष्टीची "नैसर्गिक प्रतिक्रिया" होती आणि ती हिंदूंनी 'हे राम' म्हणण्यासारखीच होती, असे एनआयएच्या सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितलंय.
दुसरीकडे मुझम्मिलचा भाऊ मुख्तार अहमद कुम्हारने सांगितले की, त्याचा भाऊ 3 वर्षांपासून बैसरन व्हॅलीमध्ये काम करत आहे. 22 एप्रिल रोजी हल्ला झाला तेव्हा तो घरी पळून गेला आणि घाबरला. व्हिडीओमध्ये 'अल्लाह-हू-अकबर' म्हणत असलेला व्यक्ती त्याचा भाऊ आहे. मुख्तार अहमद कुम्हार पुढे म्हणाला की, 'व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की माझ्या भावालाही तिथे काय चालले आहे हे माहित नव्हतं'
व्हायरल झालेल्या व्हिडीओतील व्यक्ती ही गुजरातच्या अहमदाबादची असून, त्यांचे नाव रिषी भट असे आहे. त्यादिवशी ते झिपलाइन वर अँडव्हेंजर स्पोर्ट्सचा आनंद घेत असताना काय घडलं याबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला, "आम्ही कुठल्याही टूर कंपनीच्या मार्फत गेलो नव्हतो. आम्ही स्वतंत्र गेलो होतो. मी 16 तारखेला अहमदाबाद मधून निघालो. 22 तारखेला जेव्हा घटना घडली तेव्हा मी पहलगाममध्ये होतो. 12 वाजता आम्ही तेथे पोहोचलो, घोड्यावर बसून वरती गेलो, फोटो वगैरे काढले आणि मग झिपलाईनसाठी गेलो. माझ्या मुलानंतर मी झिपलाइनवर गेलो. मी तिथे हवेत असताना अचानक 4 ते 5 वेळा गोळीबार झाला."
"पहिले 30 सेकंद मला काहीच समजलं नाही. मी माझ्याच धुंदीत मजा मस्ती करत होतो. मग मला कळलं की खाली गोळीबार सुरु आहे. लोकांचा जीव जातोय. 5-6 जणांचा गोळ्या लागल्या आहेत. त्यानंतर मला कळलं की इथे दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. ते दहशतवादी तीनदा 'अल्लाहू अकबर' ओरडले आणि त्यानंतर गोळीबाराला सुरुवात झाली. माझ्या आधी ज्या दोन कुटुंबानी झिपलाइन केलं होतं, त्यातील पुरुषांना धर्म विचारून आणि हिंदू असल्याचं सांगितल्यावर गोळ्या घालून मारण्यात आलं होतं. माझ्या मुलाने आणि पत्नीने मला हे सांगितलं. मग मी खाली उतरताच सगळ्यांना घेऊन जीव वाचवायला पळून टेकडीवरू खाली गेलो.''
"आम्ही धावत असताना एक मोठा खड्डा होता, तेथे बाकी लोकंही लपले होते. तेथेच आम्हीही लपलो. 8-10 मिनिटांनी थोडा गोळीबार कमी झाला. आम्ही पुन्हा धावत असताना परत गोळीबार सुरु झाला. त्यात काहींना गोळी लागली. आमच्या डोळ्यादेखत अंदाजे 15-16 लोकांना गोळ्या लागल्या. आम्ही मेन गेट वर पोहोचलो तेव्हा स्थानिक लोक निघून गेले होते. एक घोडेवाला होता, तो आम्हाला पुढे घेऊन जात होता. त्यावेळी आम्हाला भारतीय आर्मीचे लोकही भेटले. आर्मीच्या जवानांनी आम्हा पर्यटकांना कव्हर केले होते," असे रिषी भट म्हणाले.