Pahalgam Terror Attack: सैन्याचा वापर न करताही पाकिस्तानचा बदला घेण्याचे 4 मार्ग

Pahalgam Terror Attack: फक्त सैन्यबळाचा वापर करुन पाकिस्तानला जेरीस आणण्यापेक्षा 4 वेगवेगळ्या मार्गांनी पाकिस्तानची कोंडी करता येऊ शकते  

शिवराज यादव | Updated: Apr 24, 2025, 09:24 PM IST
Pahalgam Terror Attack: सैन्याचा वापर न करताही पाकिस्तानचा बदला घेण्याचे 4 मार्ग

Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी देशभरातून होत आहे. मात्र यावेळी फक्त सैन्यबळाचा वापर करुन पाकिस्तानला जेरीस आणण्यापेक्षा 4 वेगवेगळ्या मार्गांनी पाकिस्तानची कोंडी करता येऊ शकते. आणि पाकिस्तानला अद्दल घडवली जाऊ शकते. कोणते आहेत ते 4 मार्ग जाणून घेऊयात.

दहशतवादी पाकिस्तानच्या नांग्या ठेचाच

नापाक पाकचा बदला घेण्याचे 4 मार्ग

पाकची चारी बाजूंनी कोंडी करण्याची रणनिती

जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये झालेला दहशतवादी हल्ला आता पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवणार आहे. धर्मांध विषारी पाकिस्तानची नांगी कायमची ठेचण्यासाठी आता भारतानं फक्त सैन्यबळाचा नाही तर पाकिस्तानला चारी बाजूनं घेरण्याचा मेगाप्लॅन आखणं गरजेचं आहे. त्यादृष्टीनं भारत सरकारनं कालपासूनच पावलं टाकायला सुरुवात केली आहे. मात्र ही फक्त सुरुवात आहे. 

पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी 4 महत्त्वाचे मार्ग आहेत, ज्यामुळं भारत पाकिस्तानची चारीबाजुने नाकाबंदी करु शकतं. यातला पहिला आणि महत्त्वाचा मार्ग आहे आंतरराष्ट्रीय दबावाचा. मागच्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानला खुल्या आणि छुप्या पद्धतीनं चीन आणि अमेरिका या बलाढ्य राष्ट्रांची मदत मिळत आहे. पहलगामधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरलेली अत्याधुनिक शस्त्रही चीन आणि अमेरिकन बनावटीची होती अशी माहिती समोर आली. त्यामुळं आत्ता पाकिस्तान नामक सापाला दुध पाजणाऱ्या या देशांनाच पाकिस्तान डसू शकतो हे भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर पटवूनद देणं गरजेचं आहे.

पाकिस्तानात महागाईनं उच्चांक गाठला आहे. तिथल्या लोकांना दोनवेळचं जेवण मिळवण्यासाठी जंगजंग पछाडावं लागतंय. एकीकडे ही आर्थिक स्थिती बघता पाकिस्तानचे सध्या खायची पंचाईत झालीय. मात्र दुसरीकडे दहशतवाद्यांना चीनी अमेरिकी महागडी अत्याधुनिक शस्त्र पुरवली जाताहेत. यामुळं पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी भारतानं विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. 

तिसरा पर्याय जो आजवर भारतानं अनेकवेळा वापरलाय, तो आहे सैन्याचा दबाव. आजवर पाकिस्तानविरोधात झालेली युद्ध नुकतंच 2019 साली भारतानं पाकिस्तानविरोधात केलेला एअर स्ट्राईक, याच्या जखमा पाकिस्तान विसरला असेल तर पाकिस्तानला आयष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवणं गरजेचं आहे. ते काम आपलं भारतीय सैन्य लिलया करु शकतं.

पाकिस्तानचं जगणं मुश्कील करण्याचा चौथा मार्ग आहे राजकीय मुत्सद्देगिरी आणि दबाव. त्याची झलक भारत सरकारनं कालच्या काही निर्णयातून दाखवलीच आहे. मग त्यात सिंधू जल कराराला स्थगिती, पाकिस्तानींना व्हिजा बंदी, अटारी वाघा बॉर्डर बंद करणं या निर्णयांमुळे पाकिस्तानवर दबाव टाकून त्यांची नांगी ठेचता येईल.

पहलगामवर दहशतवादी हल्ला करुन निष्पाप पर्यटकांचा जीव घेऊन पाकिस्ताननं स्व:चं मरण ओढावून घेतलंय. मात्र पाकिस्तानची नांगी ठेचायला हे 4 मार्ग विचार करायला सोपे वाटले तरी संयमाने, सातत्य ठेवून त्याची योग्य अंमलबजावणी केली तर पाकिस्तानला देशोधडीला लावून आयुष्याचा धडा शिकवता येईल.