भारताच्या सामर्थ्यापुढे पाकिस्तानची अजितबात औकात नाही. तरीही पाकिस्तान सुधारायला तयार नाही. पाकिस्तान अशाच प्रकारे खूमखूमी दाखवत राहिला तर पाकिस्तानला काही मिनिटं नव्हे तर काही सेकंदातच खाक करू शकतो एवढी क्षमता भारताकडे आहे.
भारताला वारंवार युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या सामर्थ्यांचा अंदाज नाही. भारताच्या सामर्थ्यापुढे पाकिस्तानची औकात देखील नाही. त्यामुळे पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्ताननं वेळीच आपल्या कुरापतींना आवर घालावा अन्य़था पाकिस्तानला याची मोठी किंमत चुकवावी लागणार. भारताकडे अशा काही मिसाईल्स आहेत ज्या द्वारे पाकिस्तानला काही मिनिटांत खाक करता येईल.
- अग्नि मिसाईल्सची ताकद
भारताकडे असणारं अग्नि-I या मिसालईची रेंज 700 ते 1200 किलो मिटर एवढी आहे.. ही शॉर्ट रेंजची बॅलिस्टिक मिसाइल आहे.
अग्नि-II ची रेंज 2 हजार ते 3 हजार किमी. ही मध्यम रेंजची बॅलिस्टिक मिसाइल आहे
अग्नि-III या मिसाईलची रेंज ही 3 हजार ते 5 हजार किलोमिटर
अग्नि-IV: रेंज 3 हजार 500 किमी ते 4 हजार किमी एवढी आहे
अग्नि-V: रेंज 5 हजार ते 8 हजार किमी एवढी असून ही इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल आहे
तर अग्नि-प्राइम या मिसाइलची रेंज 10 हजार ते 20 हजार किमी एवढी आहे ही मिसाईल एकाच वेळी अनेक ठिकाणी मारा करू शकते
ब्रह्मोसची ताकद
भारताच्या ब्रह्मोस मिसाईलची रेंज 290 ते 600 किलोमिटर एवढी आहे. ही सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल आहे या मिसाईल जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडीवरूनही मारा करू शकते
प्रलय मिसाइलची रेंज 150-500 किमी. ही शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक मिसाइल आहे.
वैशिष्ट्ये - चूक हल्ल्यासाठी, त्वरित लाँचची क्षमता
शौर्य मिसाइलची रेंज 700-1,900 किमी. ही हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाइल आहे
रुद्रम-II मिसाइलची रेंज 300-350 किमी. ही हायपरसॉनिक एअर-लाँन्च मिसाइल आहे
या मिसाइलचं वैशिष्ट्ये हे रडार आणि शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यासाठी होतो
K-4 (SLBM) मिसाइलची रेंज 3,500 किमी. ही सबमरीन-लाँच्ड बॅलिस्टिक मिसाइल आहे
किती वेळात पाक खाक?
ब्रह्मोस -
लाहोरसारख्या जवळच्या शहराला 10-20 सेकंदात आणि इस्लामाबादला 1-2 मिनिटांत लक्ष्य करू शकते.
शौर्य-
लाहोरला 5-10 सेकंद, इस्लामाबादला 30-40 सेकंद, कराचीला 2-3 मिनिटांत लक्ष्य करू शकते
अग्नि आणि प्रलय-
इस्लामाबाद 1-2 मिनिटांत, कराची 4-5 मिनिटांत लक्ष्य करू शकते
रुद्रम-II:
इस्लामाबादला 1-2 मिनिटांत, पेशावरला 2 मिनिटांत.
अग्नि-V: कराची किंवा क्वेटाला 4-6 मिनिटांत लक्ष्य करुन खाक करू शकते
दरम्यान आपली ताकद किती आणि आपण बोलतो किती अशी गत पाकड्यांची झालेली दिसते. कारण पाकिस्तान आणि भारताच्या सैन्य आणि शस्त्रशक्तीची तुलना केल्यास पाकिस्तान भारतापेक्षा मागेच आहे.
जागतिक मिलिटरी रँकिंग
भारत - चौथ्या स्थानी
पाकिस्तान - बाराव्या स्थानी
भारत सैन्यबळ - 14 लाख 55 हजार 550
पाकिस्तान सैन्यबळ - 6 लाख 64 हजार
भारत
रणगाडे - 4 हजार 614
पाकिस्तान
रणगाडे - 3 हजार 742
भारत
एअरक्राफ्ट - 2 हजार 229
पाकिस्तान
एअरक्राफ्ट - 1 हजार 399
भारत
जेट्स - 513
पाकिस्तान
जेट्स - 328
भारत
हवाई टँकर - 6
पाकिस्तान
हवाई टँकर - 4
भारत
युद्धनौका - 293
पाकिस्तान
युद्धनौका - 121
भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला आपण याआधीही अनेकदा धडा शिकवला आहे. मात्र, तरीही पाकिस्तान ठिकाण्यावर येत नसून भारताविरोधात गऱळ ओकत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या पाकड्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असून त्यांच्या नांग्या वेळीच ठेचणं गरजेचं आहे..