नफा नव्हे सेवेला प्राधान्य; पतंजलीच्या आरोग्यवर्धक गुलाब सरबताचे कैक गुणधर्म

Patanjalis Rose Sharbat : नफा नव्हे सेवेला प्राधान्य हाच मंत्र जपत पतंजलीकडून आरोग्यवर्धक असं गुलाब सरबत तयार करण्यात आलं. काय आहेत त्याचे गुणधर्म?   

ब्युरो | Updated: Apr 28, 2025, 01:17 PM IST
नफा नव्हे सेवेला प्राधान्य; पतंजलीच्या आरोग्यवर्धक गुलाब सरबताचे कैक गुणधर्म
Patanjalis Rose Sharbat Made for Service Not Profit with Health Benefits

Patanjalis Rose Sharbat : बाबा रामदेव यांनी पाया रचलेल्या आयुर्वेदिक कंपनी पतंजलीनं पुन्हा एकदा गुलाब सरबत आणि खस, बेल सरबतचा पुरवठा वाढवला आहे. देशातील उष्णतेची लाट आणखी तीव्र होत असल्यामुळं अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवतच पतंजलीकडून सरबताच्या उत्पादनात वाढ करण्यात आलीआहे. आयुर्वेदिक आहार आणि चांगल्या घटकांपासून बनवलेल्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पतंजलीनं यानिमित्तानं पुन्हा एकदा ग्राहकांना दिली जाणारी सेवा केंद्रस्थानी ठेवली आहे.

पतंजली आयुर्वेदाच्या प्रारंभीच योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी ठरवले होते की पतंजली अशी उत्पादने तयार करेल ज्यामुळे आयुर्वेदाचे फायदे सामान्यांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील. कारण फक्त नफा कमवणे हेतू पतंजलीनं कधीच केंद्रस्थानी ठेवला नाही.

सामान्यांचं आरोग्य महत्त्वाचं...

आज, पतंजली ही एफएमसीजी क्षेत्पात एक मोठी कंपनी आहे. जर पतंजलीला हवे असते तर ते कोका कोला सारखे कार्बोनेटेड किंवा तत्सम पेयही बाजारात आणू शकले असते. ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत त्याच्या नफ्याचा वाटा मोठा झाला असता. पण पतंजलीने नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत त्यांच्यासाठीच हा मार्ग स्वीकारला आहे. उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा देणारं गुलाब सरबत, खस सरबत आणि बेल सरबत यांसारखी पेय पतंजलीनं बाजारात आणत त्यांची किंमतही कमी ठेवली आहे. 

गुलाब सरबताची वैशिष्ट्य

पतंजलीच्या गुलाब सरबतासाठी उत्तम प्रतीची गुलाबं आणि त्यांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार, हे सरबत मन शांत करून शरीराला थंडावा देतं. हे सरबत थंड पाण्यात किंवा दुधात मिसळून सहज सेवन करता येतं. ज्यामुळं उर्वरित गुलाबाच्या चवीचं पेय बाजारात उपलब्ध असतानाही पतंजलीचं वेगळेपण सिद्ध होत आहे. इतर सरबतांना फक्त रंग आणि सुगंध आहे. 

गुलाब सरबत पिण्याचे फायदे

पतंजलीने जुन्या पारंपारिक आणि आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करून गुलाबाचं सरबत बनवलं आहे. यासाठी थेट शेतकऱ्यांकडून गुलाब खरेदी केले जातात. ज्यामुळे फुलं ताजी आणि चांगली राहतात. या सरबताची गुणवत्ताही चांगली असते आणि ती आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या सरबतमध्ये गुलाबासोबतच काही इतर आयुर्वेदिक औषधी वनस्पती देखील मिसळल्या जातात, ज्यामुळे उन्हाळ्यात थंडावा मिळतो.

(Disclaimer - This article is part of India Dotcom Pvt Lt’s consumer connect initiative, a paid publication program IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)