भूत-प्रेत अन् अदृष्य व्यक्ती म्हणत आईनेच दोन मुलींचा जीव घेतला, 10 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; शिक्षाही बदलली

SC Relief To Mom Due To Invisible Powers: छत्तीसगड येथे महिलेने दोन मुलींचा जीव घेतल्याची घटना घडली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आईची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 29, 2025, 11:39 AM IST
भूत-प्रेत अन् अदृष्य व्यक्ती म्हणत आईनेच दोन मुलींचा जीव घेतला, 10 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; शिक्षाही बदलली
SC relief to mom who killed 2 kids under spell of invisible in chhattisgarh

SC Relief To Mom Due To Invisible Powers: छत्तसीगढमधील एका महिलेला तिच्याच मुलींच्या हत्या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला आहे. या निकालाची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि कोर्टाने हा निर्णय का दिला? जाणून घ्या. 

आंगणवाडी कार्यकर्ता असलेली महिला तिच्या कुटुंबासह आनंदाने जीवन जगत होती. मात्र अचानक एक दिवस तिने तिच्या पाच वर्षांच्या आणि तीन वर्षांच्या मुलीची लोखंडाच्या सळईने मारहाण केली. यातच दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महिला सतत रडायची. त्यानंतर तिने दावा केला की, जेव्हा घटना घडली तेव्हा माझ्यावर अदृश्य शक्तींचा प्रभाव होता. मात्र, तिच्या या दाव्यानंतरही सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने तिला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र सोमवारी न्यायमूर्ती बी.वी नागरत्ना आणि एन कोटिस्वर सिंह यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात म्हटलं आहे की, महिलेचा हत्या करण्याचा कोणाताही विचार नव्हता. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, जस्टिस बी.वी. नागरथना आणि जस्टिस एन, कोटिस्वर सिंह यांच्या खंडपीठाने सोमवारी या प्रकरणात सुनावणी होती. न्यायमूर्ती सिंह यांनी म्हटलं आहे की, अदृश्य शक्तींचा प्रभाव म्हणजेच तिची मानसिक स्थिती ठिक नसणार. कोर्टाने म्हटलं आहे की, महिलेने हेतूपूर्वक हत्या केली नसणार. त्यामुळं तिची शिक्षा बदलून नकळतपणे झालेली हत्या अशी बदलण्यात आली. ही महिला जवळपास 10 वर्षांपासून जेलमध्ये होती. कोर्टाने आता तिची सुटका केली आहे. 

कोर्टाने म्हटलं आहे की, घटनेच्या साधारण 15 दिवस आधी महिला विचित्र वागत होती. ती स्वतःला देवी आई किंवा म्हातारी आजी असं म्हणायची. त्यानंतर तिला मनोचिकित्सककडे नेण्यात आले. जस्टिस सिंह यांनी म्हटलं की, ग्रामीण भागात अंधविश्वासाला खतपाणी घालण्यात येते. मानसिक समस्यांना अनेकदा अदृश्य शक्तींचा आधार देण्यात येतो. अशावेळी महिलेला अचानक मानसिक विकाराचा दौरा पडू शकतो. त्यामुळं भयंकर पाऊल उचलण्यात येत आहे. 

कोर्टाने कोणत्या आधारे केली सुटका

कोर्टाने या प्रकरणात म्हटलं आहे की, एक आई जिचे तिच्या मुलींवर प्रेम आहे आणि नवऱ्यासोबतही चांगले संबंध आहेत. त्यामुळं कोणत्याही कारणाशिवाय ते इतके मोठे हिंसक पाऊल का उचलले असते. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, महिलेला मानसिक आजार होता जो नियंत्रणाबाहेर होता. "ग्रामीण भागातील लोकांना अनेकदा स्किझोफ्रेनिया किंवा बायपोलर डिसऑर्डर सारख्या मानसिक आजारांबद्दल माहिती नसते. त्यांची लक्षणे ओळखणे कठीण असते आणि लोक त्यांना अंधश्रद्धेशी जोडतात आणि त्यांना 'अदृश्य शक्तींचा' परिणाम मानतात. अशा परिस्थितीत उपचार केले जात नाहीत आणि परिस्थिती आणखी बिकट होते." या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने महिलेला निर्दोष सोडले आहे.