UPSC Success Story: सौंदर्यापुढे तर बॉलिवूड अभिनेत्रीही फेल; हुशारीने तमाली 23 व्या वर्षी 'अशी' बनली अधिकारी!

UPSC Success Story: आज आपण अशाच एका उमेदवाराबद्दल जाणून घेणार आहोत. जिने लहान वयातच यूपीएससी उत्तीर्ण केली. 

प्रविण दाभोळकर | Updated: Apr 21, 2025, 11:04 PM IST
UPSC Success Story: सौंदर्यापुढे तर बॉलिवूड अभिनेत्रीही फेल; हुशारीने तमाली 23 व्या वर्षी 'अशी' बनली अधिकारी!
तमाली शाह

UPSC Success Story: यूपीएससी नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात. पण त्यापैकी काही मोजकेच उमेदवार ही कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. काही उमेदवार अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आणि वारंवार प्रयत्नांनंतर या परीक्षेत यशस्वी होतात. तर काही उमेदवार असे आहेत जे अगदी लहान वयात आणि पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करून एक आदर्श निर्माण करतात.

आज आपण अशाच एका उमेदवाराबद्दल जाणून घेणार आहोत. जिने लहान वयातच यूपीएससी उत्तीर्ण केली. एवढेच नव्हे तर भारतीय वन सेवेत (आयएफएस) अधिकारी बनून एक नवा इतिहासही रचला. पश्चिम बंगालच्या तमाली साहा यांनी कठोर परिश्रम, समर्पण आणि दृढनिश्चयाच्या जोरावर वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी ही कामगिरी करुन दाखवली. ज्यासाठी तरुणांना अनेक वर्ष लागतात.यामुळे तमाली आता देशभरातील  लाखो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत.

तमाली साहा यांचा जन्म  पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात झाला. इथेच त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तमाली लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थिनी होत्या.  शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तमाली यांनी कोलकाता विद्यापीठात प्रवेश घेतला.येथून त्ांनी प्राणीशास्त्रात पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. नागरी सेवेत सामील होणे आणि देशाची सेवा करणे, हे त्यांचे ध्येय होते. 

तमाली साहा यांनी तयारीसाठी एक पद्धतशीर रणनीती अवलंबली. यामुळेच त्यांना कठोर परिश्रमाचे फळ मिळाले. 2020 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी UPSC भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा उत्तीर्ण केली. तमाली यांनी संपूर्ण भारतात 94 वा क्रमांक मिळवला. यश हे वय किंवा अनुभवावर अवलंबून नसून दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमावर अवलंबून असते हे त्यांनी सिद्ध केले.

यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर तमाली साहा यांना भारतीय वन सेवेत (आयएफएस) दाखल करण्यात आले. त्यांना पश्चिम बंगालमध्ये नियुक्ती मिळाली आणि त्यांनी वन विभागात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची ही कामगिरी त्यांच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी अभिमानाचा क्षण तर होताच. पण यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत यशस्वी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी प्रेरणा होती. तमाली साहा यांची कहाणी ही योग्य दिशा, शिस्त आणि समर्पणाने कोणतेही कठीण ध्येय साध्य करता येते, याचे मुर्तीमंत उदाहरण आहे. जर तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती प्रामाणिक असाल आणि कठोर परिश्रम केले तर कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही, हे  त्याच्या यशातून सिद्ध होते.