अंत्यसंस्कार न करता टॉवरवर गरुड-कावळ्यांसाठी सोडला जातो मृतदेह; पाकिस्तानातही आहे 'ही' प्रथा

भारत आणि पाकिस्तानात राहत असलेल्या एका समुदायात शतकानुशतके एक परंपरा आहे. हे लोक त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह एका खास टॉवरवर ठेवतात. काय आहे ही परंपरा?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 23, 2025, 09:12 PM IST
अंत्यसंस्कार न करता टॉवरवर गरुड-कावळ्यांसाठी सोडला जातो मृतदेह; पाकिस्तानातही आहे 'ही' प्रथा

मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीचे अंतिम संस्कार त्याच्या धर्मानुसार केले जातात. हिंदूं संस्कृतीमध्ये त्यांच्या मृतदेहांचे मृत्यूनंतर दहन केले जाते. तर मुस्लिमांमध्ये मृत्यूनंतर मृतदेह पुरला जातो. पण या जगात असा एक समुदाय आहे जो त्यांच्या नातेवाईकांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह पुरत नाही किंवा जाळत नाही. त्याऐवजी मृतदेह एका खास टॉवरवर ठेवला जातो.

हे लोक कोण आहेत?

पारशी एक असा समुदायाचे आहे जे वेगळ्या पद्धतीने अंतिम संस्कार करतात. पारशी समाजात ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर, हे लोक त्यांचे मृतदेह टॉवर ऑफ सायलेन्सवर ठेवतात. या प्रथेसाठी 'दख्मा' हा एक विशेष शब्द वापरला जातो. प्रत्यक्षात, पारशी समुदायाचे लोक असे मानतात की, मृत्यूनंतर मानवी शरीर निसर्गात परत केले पाहिजे. हेच कारण आहे की, पारशी लोक मनोऱ्यावर मृतदेह ठेवतात जेणेकरून गरुड आणि कावळे त्यांना खाऊ शकतील आणि त्यांचे पोट भरू शकतील.

या प्रथेबद्दल पारशी लोकांचे काय मत?

या विषयावर बीबीसीशी बोलताना, कोलकात्याच्या पारशी अग्नि मंदिराचे पुजारी जिमी होमी तारापोरवाला म्हणतात की, भारतातील पहिला टॉवर ऑफ सायलेन्स कोलकात्यात बांधला गेला होता. आपण शतकानुशतके ही परंपरा पाळत आलो आहोत. तारापोरवाला म्हणतात की, हे मृतदेह प्रामुख्याने गिधाडे खातात. कावळे आणि इतर पक्षी देखील कधीकधी हे मृतदेह खाण्यासाठी टॉवर ऑफ सायलेन्सवर येतात.

पाकिस्तानातही हीच परंपरा

भारत आणि पाकिस्तान दोन्ही ठिकाणी तुम्हाला पारशी समुदायाचे लोक आढळतील. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात पारशी लोकांची संख्या 57264होती. 2001 च्या जनगणनेनुसार, भारतात त्यांची संख्या 69 हजारांपेक्षा जास्त होती. तर, जर आपण पाकिस्तानबद्दल बोललो तर, 2015 च्या जनगणनेनुसार, पाकिस्तानमध्ये पारशींची संख्या 1092 होती.