)
Chanakya Niti on Office Politics: आचार्य चाणक्य यांच्या नीति शास्त्रात जीवनातील यश आणि समृद्धीसाठी व्यावहारिक सूत्रे सांगितली आहेत. या नीति केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर व्यावसायिक क्षेत्रातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य नीति अनुसरल्यास करिअरमध्ये प्रगती आणि स्थिरता मिळवता येते. त्यांनी सांगितलेले साधे पण प्रभावी उपाय प्रत्येक टप्प्यावर उपयोगी ठरतात, विशेषतः कार्यालयीन वातावरणात वावरताना तुम्हाला याचा फायदा होईल.
“परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम्। वर्जयेत्तादृशं मित्रं विषकुम्भम्पयोमुखम्।।” हा चाणक्य नीति मधील एक श्लोक आहे. याचा अर्थ, कार्यालयात काही लोकांपासून अंतर ठेवणे फायद्याचे आहे. यात चार प्रकारचे लोक समाविष्ट आहेत, जे तुमच्या प्रगतीला खीळ घालू शकतात. त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.
चाणक्य सांगतात, जे लोक समोरासमोर तुमचे कौतुक करतात, पण मागे तुमची निंदा करतात, त्यांच्यापासून सावध रहा. असे लोक गोड बोलून विश्वास संपादन करतात, पण तुमच्या कामात अडथळे आणण्याची संधी सोडत नाहीत. त्यांचा हेतू तुमच्या यशाला तडा देण्याचा असतो.
कार्यालयात काही लोक सतत टिप्पणी करतात किंवा तुमची थट्टा करतात, ज्यामुळे तुमची प्रतिमा डागाळते. अशा व्यक्ती सहकाऱ्यांना कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ दाखवतात आणि तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. त्यांच्याशी दूरी ठेवणे हिताचे आहे.
चाणक्य नीतीनुसार, ऑफिसमध्ये असे बरेच लोक आहेत जे स्वतःसमोर इतर सर्वांना लहान मानतात. अशा लोकांपासून अंतर ठेवणे फायदेशीर आहे. हे लोक कोणालाही प्रगती करताना पाहू शकत नाहीत आणि त्यामुळे कामात अडथळे निर्माण करू शकतात.
जे सहकारी किंवा वरिष्ठ तुमच्या यशाची प्रशंसा होत असताना त्याला कमी लेखतात, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल ईर्ष्या असते. असे लोक तुमच्या प्रगतीत आनंदी होत नाहीत आणि तुमच्या कामात बाधा आणू शकतात. चाणक्य सांगतात, अशा हृदयात जळफळाट बाळगणाऱ्यांपासून सावध राहून अंतर ठेवावे, जेणेकरून तुमचे करिअर सुरक्षित राहील.
उत्तर: चाणक्य नीति जीवनातील यश आणि समृद्धीसाठी व्यावहारिक सूत्रे सांगते, जी वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मार्गदर्शक ठरतात. कार्यालयात यश मिळवण्यासाठी ती साधे पण प्रभावी उपाय सुचवते, जसे की काही लोकांपासून अंतर ठेवणे. यामुळे करिअरमधील अडथळे टाळून प्रगती आणि स्थिरता मिळवता येते, विशेषतः कार्यालयीन राजकारणाला सामोरे जाताना.
उत्तर: चाणक्य नीतिनुसार, कार्यालयात चार प्रकारच्या लोकांपासून सावध राहावे: १) समोरासमोर तारीफ करणारे, पण मागे निंदा करणारे; २) सतत चेष्टा किंवा टोमणे मारणारे; ३) इतरांना कमी लेखणारे; ४) यशाबद्दल जळफळाट आणि ईर्ष्या करणारे. हे लोक तुमच्या प्रगतीला खीळ घालू शकतात, म्हणून त्यांच्यापासून अंतर ठेवणे फायद्याचे आहे.
उत्तर: चाणक्य नीतिमधील श्लोक “परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम्। वर्जयेत्तादृशं मित्रं विषकुम्भम्पयोमुखम्।।” सांगतो की, जे लोक समोर गोड बोलतात पण मागे तुमच्या कामाला हानी पोहोचवतात, त्यांच्यापासून सावध राहावे. कार्यालयात असे सहकारी किंवा वरिष्ठ तुमची प्रतिमा डागाळू शकतात किंवा प्रगतीत अडथळे आणू शकतात, त्यामुळे त्यांच्याशी दूरी ठेवून करिअर सुरक्षित ठेवावे.
(Desclaimer- येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. झी 24 तास त्याला दुजोरा देत नाही. यासाठी, कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)