Bathing Benefits : अंघोळीनंतरही अस्वच्छ राहतात शरिराचे 'हे' 5 अवयव, तुमचंही होतंय स्वच्छतेकडे दुर्लक्ष?

Bathing Benefits : रोज अंघोळ करताना अस्वच्छ राहतात शरिराचे हे अवयव... कसं द्याल स्वत: च्या स्वच्छतेकडे लक्ष?

दिक्षा पाटील | Updated: May 8, 2025, 01:45 PM IST
Bathing Benefits : अंघोळीनंतरही अस्वच्छ राहतात शरिराचे 'हे' 5 अवयव, तुमचंही होतंय स्वच्छतेकडे दुर्लक्ष?
(Photo Credit : Freepik)

Bathing Benefits : आपल्या संस्कृतीत लोकं रोज सकाळी अंघोळ करणं जणू आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आपल्या देशात अंघोळ ही फक्त स्वच्छतेपुरती मर्यादित नसून ती जणू आपल्याला मानसिक समाधान देतं असं म्हणतो. पण असं असलं तरी अंघोळीनंतरही शरीराचे काही भाग हे नीट धुतले जात नाहीत आणि त्यामुळे तेथे घाण राहते. या सगळ्या प्रकरणामुळे आपल्याला आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत स्वत: ला स्वच्छ ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया. कारण असे काही अवयव आहेत ज्याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. 

1. डोळे

अंघोळ करत असताना बरेच लोकं हे डोळे धुण्यावर लक्ष देत नाहीत किंवा डोळे धूत नाहीत. त्यामुळे डोळ्यांमध्ये चुरचूर, कोरडेपणा आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. अंघोळीच्या वेळी एका पातेल्यात स्वच्छ पाणी भरून त्यात एक एक डोळा बुडवा विंका डोळ्यावर पाण्याच्या भरलेल्या मगात डोळे बुडवा. डोळा पाण्यात ठेवून हळूहळू उघड- झाप करा. हे प्रत्येक डोळ्यासाठी 5 वेळा केल्याने डोळे स्वच्छ राहतात.

2. कानामागचा भाग

आपण कान आतून स्वच्छ करतो, पण कानामागचा भाग अनेकदा विसरतो. तिथे घाम आणि आपण बाहेर जात असल्यानं त्या घामावर धुळ चिकटते आणि ते जर आपण साफ केलं नाही तर फंगल इंफेक्शन होण्याची शक्यता आहे. अंघोळीनंतर कोरड्या टॉवेल किंवा मऊ अशा कापडानं कानामागचा भाग व्यवस्थित पुसून घ्या.

3. नखं

नखांखाली अनेकदा घाण अडकते आणि ती सहज लक्षातही येत नाही. रोज पार्लरमध्ये जाऊन मेनिक्युअर करणं कोणाच्याशी खिशाला परवडणार नाही किंवा कोणालाही शक्य होणार नाही, पण अंघोळीच्या वेळी एखाद्या जुन्या टूथब्रशने हात-पायांचे नख स्वच्छ करता येतात. दिवसातून एकदा जरी तुम्ही असं केलं तर नखं स्वच्छ राहतात आणि वेळही फार लागत नाही.

4. बेंबी

बेंबी स्वच्छ करण्याकडे तर अनेक लोकं दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले जाते. पटपट अंघोळ करून सगळ्यांना बाहेर पडायचं असतं. पण अशात बेंबीत अडकलेली घाणं ही शरीरासाठी नुकसान ठरू शकते. जसे बेंबीत तेल घातल्याचे फायदे आहेत. तसेच तिथे साचलेल्या घाणीमुळे आजार होण्याची शक्यता खूप मोठी आहे. बेंबी स्वच्छ करण्यासाठी कापसाचा बोळा किंवा ईअर बड्सचा वापर तुम्ही करू शकता. 

5. पायांचे तळवे

अनेक लोकं हे अंघोळीच्या वेळी पायांचे तळवे स्वच्छ करत नाहीत. अनेकांना असा प्रश्न असतो की त्याला काय मळं असेल आणि पाणी घातलं तरी तो साफ होतो. पण जर पायाचे तळवे स्वच्छ धुतले नाही तर तिथे साचलेल्या मळामुळे दुर्गंधी आणि त्वचेच्या समस्या अर्थात फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. तळपाय हे तुम्ही फूट ब्रश किंवा कपडे धुण्याच्या ब्रशनं धुवू शकता. हे दोन्ही पर्याय नसतील तर फूट स्क्रबर हा एक पर्याय तुम्ही निवडू शकता. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)