Jain Monks and Nuns Sects in Marathi : भारतात अनेक समाज आनंदाने एकत्र नांदतात. प्रत्येक समाजाचे आपले वैशिष्ट्य आणि प्रथा आहेत. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आजही पाळल्या जातात. भारतात जैन समाज आहे, ज्यात अनेक अशा प्रथा ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. जैन भिक्षुकांच्या आयुष्याबद्दल आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्या जाणून तुम्हालाही धक्का बसेल. कुटुंबापासून लांब, सर्व सुखसोयींच्या त्याग करुन खूप कठोर तपश्चर्या करुन जैन भिक्षु बनतात. दिगंबर संप्रदायातील भिक्षू शरीरावर एकही कपडे परिधान करत नाहीत. या समाजाच अशी मान्यता आहे, जेव्हा भगवान महावीर ध्यानाद्वारे उंच स्तरावर पोहोचले तेव्हा त्यांना शरीराची जाणीव राहिली नाही. त्यांना कपड्याचंही भान उरलं नव्हतं.
दिगंबरा पंथात वस्त्राचा त्याग हा 'अपरिग्रह' या तत्त्वाचा पराक्रम मानला गेलाय. जैन धर्मानुसार, कपडे हे भौतिक सुख असून कपडे खरेदीसाठी पैसे लागत असतात. तसंच त्या कपड्याची स्वस्छता करण्यासाठी पैसा आणि वेळ या सगळ्या गोष्टी संसारिक जीवनाशी निगडीत मानल्या गेल्या आहेत. त्यामुळे जैन भिक्षुक कपड्यांचा त्याग करतात. जैन ऋषी हे सर्व परिग्रहांपासून वंचित असल्यामुळे ते त्यांच्याकडे फक्त मोराच्या पिसांनी बनवलेली पेची वापरतात. जी केवळ गुप्तांग झाकण्यासाठी वापरण्यात येते. काही जैन साधू मोराची पिसे किंवा शेपूटही वापरत करत नाहीत. हा धर्म अहिंसा, अहंता आणि सांसारिक गोष्टींबद्दल पूर्ण त्याग यावर विश्वास ठेवणारा असतो.
एवढंच नाही तर जैन भिक्षू यांची केस कापण्याची प्रक्रियाही देखील कठीण आणि वेदनादायी असल्याच सांगण्यात आलंय. केस लोचनासाठी ही लोक कात्री, वस्तरा, ब्लेड इत्यादी कोणत्याही साधनांचा वापर करत नाहीत. अशात डोक्याचे, दाढी, मिशा आणि शरीराच्या इतर भागांचे केस ते हाताने उपटतात. दिगंबर जैन यांच्या संत आणि आर्यिकांसाठी (स्त्री साध्वी) केश लंचन अनिवार्य मानल गेलंय. जैन भिक्षू आणि आर्यनिकांनी वर्षातून चार वेळा केश लोचन करावं लागतं. या प्रक्रियेत प्रचंड वेदना सहन करावी लागते. कधी कधी केस उपटताना रक्त येतं तरीही ते या कठीण परीक्षेतून माघार घेत नाहीत. तसंच कितीही थंडी असली तरीही ते कपडे परिधान करत नाहीत. त्यामुळे थंडीत रजाई किंवा उबदार कपडे वापरण्याचा प्रश्नच येत नाही. त्याशिवाय बिनाकपड्याचे आणि थंडीतही हे भिक्षु जमिनीवर झोपतात.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.