)
Maharashtra Jain Muni Political Party : मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कबूतरखान्याचा विषय चांगलाच पेटला आहे. आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी जैन धर्मियांकडून मुंबईमध्ये धर्मसभा भरविण्यात आली होती. यावेळी उपस्थित जैन धर्मगुरुंनी केलेल्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण झाला. प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर शस्त्र घ्यायला तयार आहोत असं वक्तव्य जैन धर्मगुरुंनी केलं. तर अहिंसेची शिकवण देणारे जर शस्त्र उचलायची भाषा करत असतील. तर काय बोलणार असा सवाल मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी व्यक्त केलंय. अशातच जैन मुनींनी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा आहे केली आहे.
जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा करण्यात आली आहे. हा राजकीय पक्ष आता निवडणिकीच्या रिंगणात उतरणार आहे. कबुतर आमचं चिन्ह असे देखील त्यांनी जाहीर केले. जनकल्याण पार्टी बीएमसी निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे. आमचा पक्ष भगवान महावीरांचा, राजकीय नाही. संत कधी कोणत्या पक्षाला पाठिंबा देत नाही. जैन मुनींकडून सरकारला दिवाळीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
दुसरीकडे जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पक्षाची घोषणा करण्यात आलीय. आणि या पक्षाचं चिन्ह कबुतर असणार आहे. एकीकडे शस्त्र उचलण्याची भाषा करायची आणि पक्षाचं नाव शांतीदूत जनकल्याण पक्ष ठेवायचं या विरोधाभास जैन मुनींच्या बोलण्यात पाहायला मिळाला. जैन धर्म हा शांतीचा संदेश देणारा आहे. मात्र मुंबईती धर्मसभेत केलेली विधाने ही धर्माच्या शिकवणीला धरून आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.. कबुतर आणि कबुतरखान्यांसदर्भात जैन मुनींनी घेतलेली भूमिका आधीपासूनच वादात सापडली आहे. आणि त्यात मुंबईतील धर्मसभेतील वक्तव्यांनी भर टाकलीय.
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय हायकोर्टाने कायम ठेवलाय. तर कबुतरांना खाद्य घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत. यावर नाराज असलेल्या जैन समाजाने मुंबईत धर्मसभेचं आयोजन केलं होतं. मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी भरवलेल्या या धर्मसभेतील जैन मुनींच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलंय.. शांती आणि भुतदयेवर बोलणाऱ्या जैन मुनींनी या धर्मसभेत हिंसेची आणि शस्त्र हाती घेण्याची भाषा केली. तर साधुसंतांमुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचंही यावेळी जैन मुनींनी म्हटलंय.. जैन मुनींच्या या वक्तव्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय.. फडणवीसांनी आपण कुणामुळे मुख्यमंत्री झालो याचा खुलासा करावा असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलंय.. कबुतरांच्या विष्ठेमुळे माणसं मरतात असं सांगणा-या डॉक्टरांना मूर्ख समजतो असं वक्तव्य जैनमुनी कैवल्य महाराजांनी अकलेचे तारे तोडलेत... तर नेमही जैन समाजाला साथ देणारे मंत्री मंगलप्रभात लोढा हे या धर्मसभेला उपस्थित नव्हते. यावेळी कैवल्य महाराज यांनी लोढा यांचाही समाचार घेतलाय..