राष्ट्रवादीचे भाजप सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन

अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट राज्य सरकारवर हल्लाबोल करुन एक प्रकारे जगताप यांची पाठराखण केलीय. सातारात हल्लाबोल आंदोलनात त्यांनी जगताप यांच्या अटकेवरुन राज्य सरकारला जाब विचारलाय. राष्ट्रवादीने भाजप सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन छेडलंय. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूरात सभा झाल्यावर काल साता-यात गांधी मैदानावर मोठी सभा घेऊन भाजप सरकारचे वाभाडे काढण्यात आले. सरकार जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला. 

Updated: Apr 9, 2018, 11:11 PM IST
राष्ट्रवादीचे भाजप सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन  title=

अहमदनगर : अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट राज्य सरकारवर हल्लाबोल करुन एक प्रकारे जगताप यांची पाठराखण केलीय. सातारात हल्लाबोल आंदोलनात त्यांनी जगताप यांच्या अटकेवरुन राज्य सरकारला जाब विचारलाय. राष्ट्रवादीने भाजप सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन छेडलंय. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूरात सभा झाल्यावर काल साता-यात गांधी मैदानावर मोठी सभा घेऊन भाजप सरकारचे वाभाडे काढण्यात आले. सरकार जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला.