Sunetra Pawar Baramati Loksabha : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या सगळ्यात बारातमी लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद-भावजयचा लढत पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ मिळविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. ते पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्याबाबत आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन दिवसांपासून बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ शहरात फिरत आहे. त्यामुळे बारामतीत आता नणंद-भाजवयांची लढत होणार असल्याचे म्हटलं जात आहे. शरद पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी हा निर्णय बारामतीकरांवर सोडून दिला आहे. तर आतापर्यंत साथ दिली, तशीच पुढेही साथ राहू द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांना हा काही भातुकलीचा खेळ नाही म्हणत माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही असे म्हटलं आहे.


"हा काही भातुकलीचा खेळ नाही. राजकारण भातुकलीचा खेळ नसतो. त्यात नाती नसतात पण जबाबदारी असते. नाती प्रेमाची असतात. मी नात्यांमध्ये आणि कामात गल्लत करत नाही. माझं काम एका जागेवर आहे. माजी नाती काही आडनावांपुरती मर्यादित नाही. मी सदानंद सुळेंसोबत जेवढा वेळ घालवते त्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांसोबत असते. नाती माझ्यासाठी कायमच राहतील. पण माझं एक प्रोफेशनल आयुष्य आहे, माझी एक वैचारिक बैठक आहे. ज्याच्यामध्ये मी लहानाची मोठी झाले. माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही. माझी वैचारिक लढाई आहे. माझी लढाई भाजप आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे. त्यांच्या चुकीच्या विचारात जे काम करत असतील त्या विचाराशी माझी लढाई आहे," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.


"राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला. शरद पवार हे संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष आहे. तार्किकदृष्ट्या बोलायचं तर हा पक्ष त्यांनाच मिळाला असता. तुमच्या वडिलांनी घर घेतलं असेत तर ते वडिलांच्या नावावरच असणार ना. तु्म्ही वडिलांना बाहेर काढू शकत नाही. कारण त्यांचे त्यावर नाव आहे. पण आता नवीन राज्य सुरु झालं आहे. देशात अदृश्य शक्ती जे करतेय हे अतिशय दुर्दैवी आहे. पण आम्ही नक्की याच्याविरोधात लढू," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.